शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

विट्यातील ३१ गाळेधारक दुहेरी संकटात

By admin | Updated: April 3, 2015 00:35 IST

पालिका व्यापारी संकुल : अनामत रकमेसाठी कर्ज, तर कर्जाच्या हप्त्यासाठी बँकांचा ससेमिरा


दिलीप मोहिते-विटा--विटा नगरपरिषदेने शिवाजी चौक व जुनी भाजी मंडई येथे नव्याने बांधलेल्या शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांच्या अनामत रकमेसाठी कर्जबाजारी झालेले ३१ गाळेधारक व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. सत्ताधारी, विरोधी नगरसेवक व नागरी हक्क संघटनेच्या राजकीय साठमारीत त्यांचा नाहक बळी गेला आहे. मार्चअखेरमुळे अनामतीसाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बॅँकांनी ससेमिरा लावला आहे. त्यामुळे गाळे तर ताब्यात मिळाले नाहीत, पण एक रुपयाचाही व्यवसाय न होता कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.
येथील शिवाजी चौकात ५० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या जुन्या खोकीधारकांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करून दुकाने काढून घेतली. त्या जागी पालिकेने टोलेजंग व्यापारी संकुल उभारले. या संकुलातील गाळे प्राधान्याने जुन्या खोकीधारकांना देण्याचे पालिकेने आश्वासन दिले. त्यानुसार इमारत पूर्ण झाल्यानंतर पालिका सभेत २१ फेबु्रवारी २०१४ च्या ठराव क्र. १७७ नुसार अनामत रक्कम भरून घेऊन गाळे वाटप प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. दि. २६ जूनला पालिकेने जुन्या ३१ खोकीधारकांकडून अनामत
रक्कम भरून घेऊन गाळ्यांचा ताबा दिला. परंतु, गाळे वाटप प्रक्रिया सदोष झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करीत विरोधी नगरसेवक व नागरी हक्क संघटनेने वाटप प्रक्रियेस स्थगिती देण्याची मागणी केली. ती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली. त्यानंतर पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरुध्द पुणे आयुक्तांकडे अपील केले. परंतु, ते अपीलही आयुक्तांनी फेटाळून लावले. त्यानंतर पालिकेने व्यापाऱ्यांना दिलेले गाळे सहा-सात महिन्यांपासून सील केले आहेत. त्यामुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला असून, त्यांना ताबाही सोडावा लागला आहे.
दरम्यान, पालिकेने ठरवून दिलेली अनामत रक्कम गाळेधारक व्यापाऱ्यांनी लाखोंचे कर्ज घेऊन पूर्णपणे भरली. व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून कर्जाचे हप्ते फेडण्याची तयारी व्यापाऱ्यांनी केली होती. परंतु, सत्ताधारी, विरोधी नगरसेवक व नागरी हक्क संघटनेच्या राजकीय साठमारीचा त्यांना फटका बसला आहे. मार्च एण्डमुळे कर्जाच्या हप्त्यासाठी बॅँका व्यापाऱ्यांच्या पाठीमागे हात धुऊन लागल्या आहेत. त्यामुळे गाळेधारकांच्या ताब्यात गाळे नाहीतच, शिवाय अनामत रकमेच्या कर्जाचा बोजा डोक्यावर पडल्याने गाळेधारक व्यापारी दुहेरी संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन, सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी या व्यापाऱ्यांना गाळ्यांचा ताबा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.