शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतीत गंभीर त्रुटी

By admin | Updated: April 2, 2015 00:42 IST

स्थायी समिती सभा : पाटबंधारे विभागावर कारवाई करण्याचा सर्वानुमते निर्णय

सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत दफ्तरी तपासणीत ११४ ग्रामपंचायतींमध्ये आर्थिक अनियमितता, कागदपत्रांची अपूर्णता आदी गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी आज बुधवारी स्थायी समिती बैठकीत दिले. त्याचप्रमाणे १९९७ पासून ग्रामपंचायतीकडून बेकायदा पाणीपट्टी वसूल करणाऱ्या पाटबंधारे विभागावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला.
जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत दफ्तर तपासणी अभियान हाती घेतले आहे. त्यानुसार ६८४ ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ११४ ग्रामपंचायतींमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. वास्तविक ग्रामपंचायत तपासणी करणे हे विस्तार अधिकाऱ्यांचे काम आहे. त्यामुळे ग्रामसेवकांबरोबर विस्तार अधिकाऱ्यांनाही नोटीस द्यावी, अशी मागणी सदस्यांनी केली.
जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीतर्फे गावात पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी नदीतून पाणी घेण्यात येते. अशा संबंधित ग्रामपंचायतींनी पाटबंधारे विभागाकडे पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे. पाटबंधारे विभागामार्फत यातील २० टक्के निधी जिल्हा परिषदेला देण्यात येतोे. परंतु १९९७ पासून हा निधी देण्यामध्ये अनियमितता आहे. अशी थकीत रक्कम अंदाजे १० कोटी रुपये असल्याचे समितीत समोर आले. तसेच ज्या ग्रामपंचायती नदीतून पाणी उपसा करीत नाहीत, त्यांच्याकडूनही पाटबंधारे विभाग पाणीपट्टी वसूल करीत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आणि त्यानंतर पाटबंधारे विभागावर कारवाई करण्याचा निर्णय समितीत घेण्यात आला. बैठकीस उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती पपाली कचरे, मनीषा पाटील, गजानन कोठावळे, उज्वला लांडगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)