शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 15:04 IST

कधी-कधी पालकांकडून शिस्तीचा भाग म्हणून अतिरेक केला जातो. नातेवाईक घरी आल्यावर किंवा कौटुंबिक सोहळ्यामध्ये काही पालक आपल्या मुलांना नातेवाईकांना मिठी मारायला लावणे, पापी द्यायला सांगणे यांसारख्या शारीरिक संवादाद्वारे त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी धमकीवजा सूचना करतात.

लहान मुले ओल्या मातीच्या गोळ्या प्रमाणे असतात, जसा आकार देऊ तसे ते घडतात, असे म्हणतात. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास योग्य दिशेनं व्हावा, यासाठी याच वयात त्यांना पैलू पाडण्याचं कार्य कटाक्षानं प्रत्येक पालक करतात. याचदरम्यान, त्यांना वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींप्रति आदरभाव, प्रेम व्यक्त करण्याचेही धडे दिले जातात. पण कधी-कधी या शिस्तीचा काही पालकांकडून अगदीच अतिरेक केला जातो. नातेवाईक घरी आल्यावर किंवा कौटुंबिक सोहळ्यामध्ये काही पालक आपल्या मुलांना नातेवाईकांना मिठी मारायला लावणे, पापी द्यायला सांगणे यांसारख्या शारीरिक संवादाद्वारे त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी जबरदस्ती करत असतात.

काही पालक तर अगदी हद्दच करतात. 'ते काका-काकी फक्त आणि फक्त तुला भेटण्यासाठी एवढ्या लांबून आपल्या घरी आले आहेत किंवा कृपा करुन माझ्यासाठी त्यांना एक पापी दे', अशी भावनिक डायलॉगबाजी करत पालक मुलांना अक्षरशः ब्लॅकमेल करतात. कहर म्हणजे पालकांचा हा इमोशनल अत्याचार केवळ नातेवाईकांपुरताच मर्यादित नसतो तर ज्यांचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही, असे नातेवाईक आणि मित्रपरिवारांसमोरही पालकांकडून 'पापी दे, मिठी दे' असा कित्ता वारंवार गिरवला जातो. 

(लहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स)

मुलांना सतत असं काही तरी करायला लावून तुम्ही शिस्त लावताय,खूप चांगले संस्कार करत आहात, असे वाटत असेल तर तो तुमचा केवळ गैरसमज आहे. कारण, मुलांच्या संमतीशिवायच त्यांना एखाद्याला मिठी मारायला सांगून, पापी द्यायला लावून तुम्ही स्वतःच त्यांच्या शारीरिक सुरक्षिततेत बाधा निर्माण करत आहात. त्यांचे नुकसान करत आहात. शारीरिक सुरक्षिततेच्या नियमांसंबंधित तुम्ही स्वतःच आपल्या मुलांमध्ये संभ्रम निर्माण करत आहात. एकीकडे तुम्ही मुलांना सांगता की, तुमच्या शरीरावर फक्त तुमचा अधिकार आहे आणि परवानगीशिवाय तुम्हाला कोणीही काहीही करण्यास सांगू शकत नाही. दुसरीकडे, त्यांच्याच संमतीविना इतरांना शारीरिक संवादाद्वारे आदरभाव व्यक्त करण्याची सक्ती केली जाते, हा पूर्णतः विरोधाभास आहे.   

(पालकांनी लहान मुलांशी कधीही करु नये तुलना!)

आपल्या संमतीशिवाय कोणीही आपल्याला स्पर्श करू शकत नाही आणि दुसऱ्यांनी तोंडाने सांगितल्याशिवाय त्यांना बोटही लावायचे नाही, हे लहान मुलांना समजावून सांगणं अत्यावश्यक आहे. लहानग्यांची संमती असणं हे कारण अतिशय महत्त्वपूर्ण आहे, यामुळे लैंगिक अत्याचार आणि प्राणघातक हल्ला, यांसारखे सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक गोष्टी टाळल्या जाऊ शकतात. मुलांवर संस्कार करताना, घडवताना त्यांना नियमानं सांगा की, कोणालाही मिठी मारणे, पापी देण्यास तुम्ही बांधलेले नाहीत. याची सुरुवात तुम्ही स्वतःच्या कुटुंबातून करा. 

स्वतःच्याच कुटुंबात हा नियम पाळताना थोड्या बहुत प्रमाणात सुरुवातीस कदाचित कठीण जाऊ शकते. कारण बऱ्याचदा कुटुंबातील मोठ्यांना लहानांकडून कोणत्याही गोष्टीसाठी संमती मागण्याची सवय नसते. उदाहरणार्थ समजा, नातेवाईक तुमच्या मुलाला मिठी मारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आवडत नसल्याने तो मिठी मारणं टाळतोय?, तर यावेळेस तुम्ही काय कराल?. ही विचित्र परिस्थिती टाळण्यासाठी पालकांनी पुढे येऊन मध्यस्थी करावी आणि म्हणावं, 'ठीक आहे पुढच्या वेळेस त्यांना मिठी मार किंवा मिठी मारायची नसेल तर त्यांच्यासोबत हस्तांदोलन (shake hands) कर', असं म्हणत तुम्ही स्वतःच आपल्या मुलांच्या मदतीला धावून जावे.

मोठ्या व्यक्तींप्रति आदरभाव, जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी केवळ प्रेमाचं प्रतीक म्हणून आपल्या मुलांनी शारीरिक संवादच साधला पाहिजे,असा कुठेही नियम नाहीय. त्याऐवजी मुलं नातेवाईकांना एखादी कविता म्हणून दाखवू शकतात, चित्र काढून दाखवू शकतात किंवा आवडीची एखादी गोष्टही ते करू शकतात. पण हे सर्वदेखील त्यांची संमती असेल तरच, त्यामुळे लक्षात ठेवा नो जबरदस्ती अॅट ऑल. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपHealthआरोग्य