शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

Video: छातीपर्यंतच्या पाण्यात भक्तांचा हरिनामाचा गजर सुरु; मुसळधार पावसामुळं मंदिर जलमय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 4:39 PM

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : श्रावण महिना सुरू असल्याने जिल्ह्यातील बहुतांश मंदिरांमध्ये सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. मात्र, या पाण्यातही भक्तांनी नाम सप्ताहात खंड पडू दिलेला नाही. रत्नागिरी तालुक्यातील तोणदे - भंडारवाडीतील सांब मंदिराला पुराच्या पाण्याने वेढले असून, छातीपर्यंत आलेल्या पाण्यात उभे राहून भाविकांनी आपला नाम गजर सुरू ठेवला होता.

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले असून, अनेकांशी संपर्क तुटला आहे. श्रावणधारा जोरदार बरसत असतानाच जिल्ह्यात अनेक ठिकाणी नाम गजर सुरू आहे.

काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने त्याचे पाणी तोणदे भागात शिरले आहे. या भागातील भंडारवाडी येथे असणाऱ्या सांब मंदिराला बुधवारी पुराच्या पाण्याचा वेढा पडला. या पुराच्या पाण्यातही येथील भाविकांनी नामसप्ताह सुरूच ठेवला होता. ग्रामस्थ होडीने मंदिरापर्यंत येत होते. तर काहीजण मंदिरात छातीपर्यंतच्या पाण्यात नाम गजर करत होते. मंदिरातील देवाच्या मूर्ती ग्रामस्थांनी उंचावर एका फळीवर ठेवल्या होत्या. मात्र, हळूहळू तेथेही पाणी भरण्यास सुरूवात झाली होती.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर