शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शिवसेना उपनेतेपदी उदय सामंत यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 20:04 IST

- रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आली आहे. 

रत्नागिरी - रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आली आहे. 

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उदय सामंत यांनी गावोगावी पक्ष वाढीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा दबदबा निर्माण केला आहे. नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी आपल्या कार्याचा चमत्कार दाखवून दिला आहे. त्यामुळेच शिवसेनेत त्यांची ‘पत’ आणखीन वाढली आहे. रत्नागिरीचे आमदार म्हणून काम करत असताना उदय सामंत यांच्यावर पुणे विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी पुणे येथील विविध समस्या हाताळण्यास सुरूवात केली आहे. त्याचबरोबर पक्षवाढीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे.

ही जबाबदारी पार पाडत असतानाच शिवसेना उपनेतेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. उपनेतेपदी निवड झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांन सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेली संघटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर २०१९ मध्ये शिवसेना स्वबळावर सत्तेवर येण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

नाणार प्रकल्प हद्दपार करणारच

राजापूर तालुक्यातील नाणार येथे रिफायनरी प्रकल्प होऊ घातलेला आहे. हा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर पक्ष याबाबत रणनीती ठरवेल आणि त्यानुसारच आपण काम करू, असे उदय सामंत म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी