शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आधी रत्नागिरी जिल्ह्याची तहान भागवा

By admin | Updated: September 26, 2015 00:21 IST

रफीक मोडक : कोयनेचे अवजल मुंबईला नेल्यास जनआंदोलनाचा इशारा

चिपळूण : कोयनेचे अवजल मुंबईला नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्या हालचाली सुरु आहेत. गेली अनेक वर्ष रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी भाग पाण्याविना तहानलेलाच आहे. असंख्य गावे तहानलेली असताना जर कोयनेचे पाणी मुंबईत नेले जात असेल तर येथील जनता गप्प बसणार नाही. कोयनेच्या वाया जाणाऱ्या पाण्यावर संपूर्ण जिल्ह्याची गरज भागवण्याची योजना प्रथम शासनाने तयार करणे गरजेचे आहे, असे मत रत्नागिरी जिल्हा काँग्रेस सचिव रफीक मोडक यांनी मांडले. ज्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे अशा ठिकाणी असणाऱ्या नद्यांना, कोयनेचे पाणी डिसेंबरपासून पुढे सोडल्यास त्या नद्यांना उन्हाळ्यातही पाणी राहून लगतच्या विहिरींतही पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही. त्यामुळे लगतच्या परिसरातील पाण्याची समस्या दूर होईल. या प्रकारची योजना संपूर्ण रत्नागिरी जिल्हाभर राबवून संपूर्ण जिल्हा १०० टक्के टँकरमुक्त केल्याशिवाय कोयनेचे पाणी मुंबईला नेऊ देणार नाही, असे मोडक यांनी सांगितले.कोयनेच्या वीज प्रकल्पावर महाराष्ट्राच्या जास्तीतजास्त भागाला विद्युत पुरवठा केला जातो. हा प्रकल्प कोकणात आहे. परंतु, त्याच कोकणावर विविध मार्गाने अन्याय होत आहे. कोयनेचे पाणी समुद्राला जाऊन मिळालेले चालते पण ते येथील शेतकरी किंवा छोट्या उद्योगांना, सर्वसामान्यांना वापरु दिले जात नाही ही गोष्ट संतापजनक आहे. या गोष्टीचा शासनाने व लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा. भविष्याचा विचार करता रत्नागिरी जिल्हा हा फलोत्पादन जिल्हा घोषित केलेला आहे. पाण्याची पुरेशी व्यवस्था नसताना भविष्यात उद्योगांसाठी पाण्याची कमतरता असताना यावर्षीप्रमाणेच पुढे पावसाचे प्रमाण कमी झाल्यास व त्यामुळे कोयना धरण ८० ते ९० टक्केच भरले तर पुढील पाच वर्षात कोयना धरण ५० टक्के पण प्रतिवर्षी भरणार नाही अशावेळी वीजनिर्मितीसाठी वापरलेले पाणी पुन्हा धरणात सोडण्याच्या योजना आताच तयार करण्याची गरज आहे. भविष्यात कोयनेचे वाया जाणारे पाणी मुंबईला नेण्याची घाई न करता प्रथम त्याचा अभ्यास व चर्चा करण्याची गरज आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी नद्या जोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. त्याप्रमाणे कोयनेचे पाणी नद्यांना उन्हाळ्यात सोडल्यास कोकणातील पाण्याचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटू शकेल. त्यामुळे कोयनेचे पाणी मुंबईत नेल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा रत्नागिरी जिल्हा काँग्रेस सचिव रफीक मोडक यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)कोयनेचे अवजल मुंबईला नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या हालचाली.संपूर्ण जिल्हा १०० टक्के टॅँकरमुक्त करा.कोकणावर अन्याय होत असल्याचा आरोप.