शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे पगार जाणार लांबणीवर!

By admin | Updated: April 8, 2015 23:54 IST

माध्यमिक विभाग : वारंवारच्या घटनेने नाराजी

टेंभ्ये : माध्यमिक शिक्षकांचे मार्च महिन्याचे एप्रिलमध्ये जमा होणारे पगार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाकडून अद्याप पगार अनुदान प्राप्त न झाल्याने पगार उशिरा जमा होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.
मार्च महिन्याचे पगार लांबणीवर पडणे हे कायमचेच झाले असल्याने शिक्षक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. ‘शालार्थ’ ही आॅनलाईन वेतन प्रणाली सुरु झाल्यापासून अपवाद वगळता एक तारखेला पगार जमा झाल्याचे पाहायला मिळत नाही. प्रत्येक वेळी पगारास होणाऱ्या विलंबास नेमके कारण काय? असा प्रश्न संघटना स्तरावरून उपस्थित केला जात आहे.
आर्थिक वर्षअखेर म्हणून मार्च महिन्याकडे पाहिले जाते. मार्च महिन्याचा पगार उशीरा होत असल्याने माध्यमिक शिक्षकांना एप्रिल महिन्यात आर्थिक घडी बसविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यावर्षी अद्याप वेतन अनुदानच जमा झाले नसल्याने पगार लांबणीवर पडणार हे निश्चित झाले आहे.
आगामी चार दिवसात अनुदान जमा झाल्यास २० मेपर्यंत शिक्षकांना पगार मिळू शकतो. अनुदान प्राप्त होण्यास उशीर झाल्यास पगार अधिक लांबणीवर जाऊ शकतो, असे मत वेतन पथक विभागातून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे मार्च महिना उशिराने होणारे पगार यामुळेच माध्यमिक शिक्षकांच्या कायम लक्षात राहतो.
माध्यमिक वेतन पथक विभागाला सध्या पूर्णवेळ अधीक्षक नसल्याने ‘शालार्थ’ ही आॅनलाईन प्रणाली कार्यान्वित होऊनदेखील जिल्ह्यात माध्यमिक शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत. जवळपास मार्च २०१२ पासून माध्यमिक वेतन पथक विभागास पूर्णवेळ अधीक्षक नाही. प्रत्येकवेळी या पदाचा अतिरिक्त कार्यभार समक्ष अधिकाऱ्याकडे दिला जातो. यामुळे या विभागाचे काम प्रत्येक वर्षाला प्रलंबित राहते. माध्यमिक शिक्षकांच्या पगाराकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
एक तारखेला पगार हा नियम रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत कधी सत्यात उतरणार आहे? असा प्रश्न विचारला जात असल्याचे माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष भारत घुले यांनी स्पष्ट केले. परंतु याबाबत शिक्षण विभागाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

आॅनलाईनमुळे उर्वरित खात्यांचे पगार वेळेत आणि जलदगतीने होत असताना दुसरीकडे शिक्षण खात्याचे पगार मात्र याच प्रणालीमुळे उशिराने होताना दिसत आहे.