शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भाग उपेक्षितच...

By admin | Updated: April 28, 2015 23:46 IST

लोकप्रतिनिधी, प्रशासनाची डोळेझाक : कळकवणेत एस. टी. नाही, रस्ते दुर्लक्षित

देव्हारे : मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांची परिस्थिती बिकट झाली असून विकासाच्या सर्व प्रश्नांवर हा भाग मागे असल्याचे पाहायला मिळत आहे. रस्ते, वीज, पाणी या प्रश्नांवर तालुक्यात कोणीही लक्ष देत नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. कळकवणे, रानवली, केरीळ, बलदेवाडी गावांचा समावेश आहे़ आपल्या ग्रामिण भागाचा विकास होईल, या उद्देशाने लोकं त्यांना निवडून देतात. मात्र, ग्रामीण भागांच्या या गरजांकडे वर्षानुवर्ष कानाडोळा करण्यात येतो़ याला जबाबदार कोण? या गावाना तालुक्यातील जोडणारे रस्ते आजही लाल मातीचे आहेत.
एस. टी.चे दर्शनही झाले नसलेल्या कळकवणे गावात १०० पेक्षा अधिक घरे आहेत़ या गावाची लोकसंख्या ३५० आहे़ मात्र, गावाला एस. टी. येत नसल्याने या गावातील शालेय विद्यार्थ्यांना लाल मातीच्या रत्यावरून पायीच चालत शाळा, हायस्कूल व कॉलेजला यावे लागते.़ हीच अवस्था रानवली, केरीळ व बलदेवाडी या गावांची आहे. या गावांमध्ये दोनशेपेक्षा जास्त घरे आहेत़ व या तिन्ही गावांची लोकसंख्या सुमारे सातशेपेक्षा जास्त आहे. मात्र, एस. टी.चे दर्शन या गावांनाही झालेले नाही. या गावांना तालुक्याशी जोडणारे रस्ते आजही डांबरीकरण्याच्या प्रतीक्षेत आहेत.़ असलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे या गावांमधे रिक्षा घेऊन जाणेही जोखमीचे होते. गावामधे एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला खाजगी वाहनाने घेऊन जाण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही. तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था पाहिली की, या रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे जीवघेणे वाटते. या रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था रस्त्यांची झालेली आहे.
या सर्व गावांमधे प्राथमिक शाळा आहेत़ मात्र, यांना माध्यामिक शिक्षणासाठी परीसरातील मध्यवर्ती ठिकाणी देव्हारे येथे यावे लागते. एस. टी. नसल्याने या गावांमधील विद्यार्थ्यांना देव्हारेपासूनचे अंतर पायी चालत जावे लागते. त्याचबरोबर बाजारासाठी येणाऱ्या ग्रामस्थांनाही पायी चालत जाण्या येण्याशिवाय पर्याय उरत नाही़ (वार्ताहर)