शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

रत्नागिरी : टंचाईने लोक झाले त्रस्त; पाणी योजना नादुरूस्त,  अल्प पाणीपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 5:35 PM

रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ६४ नळपाणी योजना नादुरुस्त असल्याने त्याचा परिणाम ८५ वाड्यांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. या नळपाणी योजनांची पाणीपट्टी ही दुरूस्तीच्या खर्चापेक्षाही कमीच असल्याने ही दुरूस्ती आता जिल्हा परिषदेला डोईजड होऊ लागली आहे. ऐन पाणीटंचाईच्या तोंडावर या योजना नादुरूस्त असल्याने आता तेथे टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

ठळक मुद्दे टंचाईने लोक झाले त्रस्त; पाणी योजना नादुरूस्त,  अल्प पाणीपट्टी- दुरूस्तीवर खर्च होतात दरवर्षी लाखो रूपये

रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ६४ नळपाणी योजना नादुरुस्त असल्याने त्याचा परिणाम ८५ वाड्यांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. या नळपाणी योजनांची पाणीपट्टी ही दुरूस्तीच्या खर्चापेक्षाही कमीच असल्याने ही दुरूस्ती आता जिल्हा परिषदेला डोईजड होऊ लागली आहे. ऐन पाणीटंचाईच्या तोंडावर या योजना नादुरूस्त असल्याने आता तेथे टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागणार आहे.जिल्हा परिषदेने ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबवल्या आहेत. या योजनांमुळे आजही लाखो लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावांतील वाड्यांचे पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी झालेले होते. नळपाणी योजनांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात ही गैरसोय दूर करण्यात आली होती.

मात्र, नळपाणी योजनांच्या दुरुस्तीकडे गेल्या वर्षीपासून दुर्लक्ष करण्यात आल्याने त्या प्रमाणापेक्षा जास्त नादुरूस्त झाल्या आहेत. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे तिन्ही हंगामात पाण्यासाठी हाल होतात.नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येत असले तरी ही दुरुस्ती वेळेवर होत नाही. त्यामुळे अनेकदा योजना नादुरुस्त झाल्याने जनतेच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो.

त्यावर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतींची धडपड सुरु असते. ग्रामीण भागात राबवण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याच्या शेकडो योजना नादुरुस्त आहेत. जिल्ह्यातील ६४ पाणी पुरवठा योजना दुरुस्त करण्यात येणार आहेत.वसुलीपेक्षा खर्चच जास्तग्रामीण भागातील नळपाणी योजनांच्या पाणीपट्टीतून जिल्हा परिषदेला कमी प्रमाणात महसूल मिळतो. तरीही पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. पाणीपट्टी वसुलीपेक्षा हा खर्च जास्त असतो.आराखड्यात दुरूस्तीची कामेनळपाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून वेळेवर अनुदान मिळत नसल्याने त्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होत्या. पाण्यासाठी लोकांचेही हाल होत असल्याने पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये त्यांच्या दुरुस्तीची कामे घेतली आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीzpजिल्हा परिषद