शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी रणरागिणी मैदानात

By admin | Updated: June 30, 2015 00:16 IST

दिवसभरात दोन मोर्चे : महापालिका पाणीपुरवठा विभागात पोलीस बंदोबस्ताची वेळ

सांगली : शहरातील विनायकनगर, महसूल कॉलनी, लतिफ पठाण गल्ली या परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेने टँकरने पाणी पुरविण्याचे दिलेले आश्वासनही न पाळल्याने या परिसरातील महिलांच्या दोन गटांनी सोमवारी पाणीपुरवठा विभागावर वेगवेगळे मोर्चे काढले. या मोर्चाला राजकीय रंग असला तरी, पाणीटंचाईमुळे महिलांचा संताप अनावर झाला होता. त्यामुळेच पाणीपुरवठा विभागाला अखेर पोलीस बंदोबस्त मागविण्याची वेळ आली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा कोलमडली आहे. नव्याने अभियंता पदाची सूत्रे हाती घेतलेले वाय. एस. जाधव यांचे पाणीपुरवठा विभागावर नियंत्रणच राहिलेले नाही. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा वारंवार विस्कळीत होत आहे. गेल्या आठवड्यात विनायकनगर, दत्तनगर, महसूल कॉलनीतील महिलांनी घागर मोर्चा काढून जाधव यांना धारेवर धरले होते. तेव्हा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची हमी त्यांनी दिली होती. पण त्यानंतरही या परिसरात पाण्याचा ठणठणाट कायम आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता सत्ताधारी काँग्रेसच्या एका नगरसेविका पुत्राने पाणीपुरवठा विभागावर महिलांचा मोर्चा काढला. अधिकाऱ्यांच्या घरात पाणी येते, पण गोरगरिबांना पाणी मिळत नाही, असा टाहो फोडत महिलांनी अधिकाऱ्यांची शिवराळ भाषेत धुलाई केली. हा मोर्चा माघारी जातो तोच, या प्रभागातील विरोधी नगरसेवकाच्या समर्थक महिलाही पाणीपुरवठा विभागात येऊन धडकल्या. त्यांनी थेट अभियंता जाधव यांचे कार्यालय गाठले. पाणी आल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही, असा इशारा देत तेथे ठिय्या मारला. महिलांचा संताप पाहून अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू मोरे यांनी महिलांची समजूत काढली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी साडेतीनपर्यंत पाणी देण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)कबुलीनामाअभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, लतिफ पठाण गल्लीमध्ये तीनशे मीटर जलवाहिनी टाकण्याची आवश्यकता आहे. पण हे काम खर्चिक आहे. त्यासाठी बराच वेळ लागणार आहे. विनायकनगरमध्ये जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असून तीन दिवसात काम पूर्ण करून नागरिकांना पाणीपुरवठा केला जाईल. तोपर्यंत नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची सोय केली जाईल. शहरात काही भागात कमी व अपुरा दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची कबुलीही त्यांनी दिली.