शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने गारठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:36 IST

रत्नागिरी : गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. सध्या पाऊस सरींवर असला तरीही येणारी सर जोरदार असून ...

रत्नागिरी : गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. सध्या पाऊस सरींवर असला तरीही येणारी सर जोरदार असून दिवसभर पावसाळी वातावरण कायम आहे. त्यामुळे या पावसाने नागरिकांना चांगलेच गारठवले आहे. सध्या तापमान २६ अंशापर्यंत पोहोचले असून वाऱ्यामुळे गारठाही वाढला आहे.

२० ते २२ जुलै या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. या पावसाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. चिपळूण, खेड या तालुक्यांना याचा फटका सर्वाधिक बसला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. मात्र, श्रावण महिना सुरू होताच पावसाचे प्रमाण वाढले आहे. सरी अधूनमधून पण जोरदार कोसळत आहेत. दिवसभर पावसाळी वातावरण कायम आहे.

गेल्या अडीच महिन्यात वार्षिक सरासरीच्या ८५ टक्के इतका पाऊस झाला आहे. हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यातही काही ठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस पडणार आहे. सध्या पावसाच्या सरी जोरदार पडत असल्याने वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला आहे. सध्या रत्नागिरीत कमाल तापमान २७ अंशावर घसरले आहे तर किमान तापमान २४ अंश इतके झाले आहे.

उन्हाळ्यात रत्नागिरीचे तापमान अगदी ३८ अंशापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणावर त्रासदायक होत हाेता. मात्र, जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावली. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात तर पावसाचा जोर अधिकच वाढला होता. ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाचे प्रमाण कमी झाले होते. परंतु गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्रीही ठरावीक सरी पडत असल्या तरीही जोरदार कोसळत आहेत. बुधवारपासून पावसाचा जोर वाढलेला दिसत आहे. दिवसभर पावसाचे वातावरण असल्याने आता वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला आहे.