शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आंब्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव, दुष्टचक्र संपता संपेना, हवामानातील बदलाचा पुन्हा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:41 IST

यावर्षी नैसर्गिक बदलामुळे आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा उशिरा असतानाच आता थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मजगाव, शीळ परिसरात थ्रीप्सचा प्रादुर्भाव आढळल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

ठळक मुद्देआंब्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव, दुष्टचक्र संपता संपेना, हवामानातील बदलाचा पुन्हा तोटातुडतुडा, उंटअळी, बुरशीपाठोपाठ हापूसच्या वाट्याला आता नवे संकट

रत्नागिरी : यावर्षी नैसर्गिक बदलामुळे आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा उशिरा असतानाच आता थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मजगाव, शीळ परिसरात थ्रीप्सचा प्रादुर्भाव आढळल्याने शेतकरी धास्तावले आहेत.यावर्षी पावसाळा लांबल्याने जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. त्यामुळे पालवी जून होऊन मोहोर प्रक्रिया जानेवारीपासून सुरू झाली. थंडी उशिरा सुरू झाल्याने मोहोरच उशिरा आला. शिवाय फळधारणाही कमी आहे.

सध्या कणी ते सुपारी एवढ्या आकाराचा आंबा झाडावर आहे. त्यातच थ्रीप्सचे संकट उद्भवले आहे. हवामानातील बदलामुळे पालवीवर तुडतुडा, उंटअळी, बुरशीचा प्रादुर्भाव झाला होता. हवामानाचा अंदाज घेत कीडरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत आहे.

मोहोरावरील उंटअळीच्या प्रादुर्भावामुळे मोहोराचा फुलोरा खाऊन काड्या शिल्लक राहात होत्या. शेतकऱ्यांनी कृषिशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उंटअळीवर नियंत्रण मिळविले असतानाच आता थ्रीप्सला सामोरे जावे लागत आहे.ऑगस्टमध्ये आलेल्या मोहोराचे शेतकऱ्यांनी संरक्षण केल्याने तयार झालेला आंबा बाजारात येऊ लागला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, यावर्षीच्या हंगामातील आंबा उशिरा बाजारात येणार आहे.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे मध्येच हा आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे. नवीन मोहोराला फळधारणा होत असतानाच थ्रीप्समुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थ्रीप्सच्या प्रादुर्भावामुळे फळ चिकूप्रमाणे होते. थ्रीप्सपासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.

नैसर्गिक स्थित्यंतराचा परिणाम दरवर्षी आंबा पिकावर होऊन आंबापीक धोक्यात येत आहे. कीडरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणतानाच थ्रीप्सचे संकट उद्भवले आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कीटकनाशक फवारणीसाठी सूचना करणे आवश्यक आहे.- राजन कदम,बागायतदार, मजगाव,रत्नागिरी 

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीTemperatureतापमान