शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

गोंधळाबाबत प्रशासनाला नोटीस देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:32 AM

रत्नागिरी : लसीकरणाबाबत मंगळवारी रत्नागिरीत झालेला गोंधळ हा ढिसाळ कारभारामुळे झाला आहे. यात तात्काळ सुधारणा झाली नाही, तर आपत्ती ...

रत्नागिरी : लसीकरणाबाबत मंगळवारी रत्नागिरीत झालेला गोंधळ हा ढिसाळ कारभारामुळे झाला आहे. यात तात्काळ सुधारणा झाली नाही, तर आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५९ व ६० (ब) चा वापर करून जिल्हा प्रशासनावर कायदेशीर कारवाईसाठी राज्य शासनाकडे नोटीस पाठविली जाईल, असा इशारा भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिला आहे.

मंगळवारी ४५ च्या पुढील वयोगटातील नागरिकांना मिस्त्री हायस्कूलमध्ये दुपारी ही लस मिळणार होती. दुसरा डोस असल्याने पूर्वनोंदणी नव्हती. त्यामुळे नागरिकांनी सकाळपासून केंद्रावर गर्दी केली. उन्हामध्ये नागरिक उभे होते. प्रचंड गोंधळ आणि गर्दीचे वातावरणात होते. २०० डोस उपलब्ध होणार होते, प्रत्यक्षात ४०० पेक्षा अधिक नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी गेले. त्यामुळे खूप गोंधळ झाला. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

प्रशासनाचा ढिसाळ कारभार नागरिकांच्या त्रासाचे कारण बनत आहे. प्रशासकीय यंत्रणेमध्ये कोणताही समन्वय नाही. लसीकरणातील अडचणी अधिकाऱ्यांनी समजून घेतलेल्या नाहीत. उन्हापासून त्रास होतो म्हणून साधा मंडप घालण्याची व्यवस्थाही प्रशासन करीत नाही, हे दुर्दैव आहे. वारंवार मागणी करून त्यात बदल होत नाही. कारण प्रशासनावर अंकुश ठेवणारी राजकीय व्यवस्था अस्तित्वात नाही. पालकमंत्र्यांनी दुर्लक्षित केलेला हा दुर्दैवी जिल्हा आहे. पूर्वनियाेजनाचा अभाव, जबाबदाऱ्यांची अस्पष्ट वाटणी, जनतेच्या अडचणींची दखल न घेता कागदोपत्री काम करण्याची पद्धती या साऱ्यामुळे जनतेला त्रास होत आहे, अशी खंत त्यांनी मांडली आहे.

गावोगावी नेटवर्क नाही, जुन्या लोकांना नोंदणी प्रक्रियेची तांत्रिक माहिती नाही, अशा लोकांना मार्गदर्शन नाही, लसीची नेमकी उपलब्धता किती, याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक नाही. असा सर्व अधांतरी व स्वैर कारभार सुरू आहे. यात तात्काळ सुधारणा झाली नाही, तर कायदेशीर कारवाईसाठी राज्य शासनाकडे नोटीस पाठविली जाईल. भारतीय जनता पार्टी यासंदर्भात अत्यंत गंभीर असून, जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही. आंदोलन करता येत नसले तरी कायद्याची दारे उघडी आहेत. आम्ही तो मार्ग जनतेसाठी अवलंबू, असा इशारा ॲड. पटवर्धन यांनी दिला आहे.