शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दमडीचाही खर्र्च नाही

By admin | Updated: January 13, 2015 00:08 IST

मग्रारोहयो : शेततळ्यांच्या कामाबाबत प्रशासकीय उदासीनता

रहिम दलाल - रत्नागिरी  -महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअतंर्गत जिल्ह्यात २४७ शेततळी बांधण्यासाठी ३ कोटी ४२ लाख ९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती़ शेततळ्यांच्या कामाकडे लक्ष दिल्यास ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात भासणारी पाणीटंचाई दूर होण्यास मोठा आधार मिळू शकतो़ मात्र, चालू आर्थिक वर्ष संपत आले तरी जिल्ह्यात शेततळ्याचे एकही काम करण्यात आले नसल्याचे म्हटले जात आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात कितीतरी पटीने पाऊस पडतो़ पावसाचे पाणी साठवण्याची कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने ते पाणी जमिनीवाटे नद्या, नाले, समुद्राला जाऊन मिळते़ पावसाचे पाणी साठवण्याच्या विविध उपाययोजना करता येऊ शकतात़ त्याबाबत सर्वच स्तरावर उदासीनता असल्याने शेततळ्यांच्या कामांकडे गांभिर्याने पाहिले जात नाही़ प्रशासकीय पातळीवरच शेततळ्यांच्या कामाबाबत उदासिनता असल्याचे दिसून येत आहे.या योजनेअंतर्गत जलसंधारण व जलसंवर्धन कामे मातीचे बांध, दगडी बांध, वनराई बंधारे, सामूहिक शेततळे, साठवण तलाव, भूमिगत बंधारे आदी कामे वृक्ष लागवड व शेतीसाठी घेण्यात येतात़ बारमाही शेती करण्याच्या दृष्टीने शेततळ्यांचा वापर करता येऊ शकतो़ त्यासाठी या योजनेच्या माध्यमातून ही कामे हाती घेण्यासाठी जिल्ह्यात २४७ शेततळीची कामे घेण्यात येणार होती़ त्यासाठी सन २०१४-१५ च्या आराखड्यामध्ये जिल्ह्यात २४७ कामांसाठी ३ कोटी ४२ लाख ९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़सर्वाधिक तळींची कामे खेड तालुक्यामध्ये ६७ एवढी करण्यात येणार होती.दरवर्षीप्रमाणे सन २०१४-१५ च्या मग्रारोहयोच्या आराखड्यामध्ये कोटीची उड्डाणे असली तरी सुमारे ४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, त्यामध्ये शेततळीच्या कामांवर दमडीही खर्च झालेली नाही. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाचा मग्रारोहयोचा आराखडाही कागदावरच राहणार असल्याचे चित्र आजच्या घडीला दिसून येत आहे.तालुकातळ्यांची कामेमंडणगड०१दापोली२१खेड६७चिपळूण६८गुहागर१२संगमेश्वर१६रत्नागिरी००लांजा२०राजापूर४२एकूण२४७