शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

कदमांमुळे राष्ट्रवादी अडचणींच्या फेऱ्यात

By admin | Updated: June 30, 2014 00:18 IST

विधानसभा निवडणूक : चार जागा खेचण्याचे आव्हान

चिपळूण : राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम हे पक्षत्याग करुन अजूनही बाहेर असल्याने जिल्ह्यातील विधानसभेच्या चार जागा अडचणीत येणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या चार जागा आपल्याकडे खेचण्याचे आव्हान नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणात उलथापालथ होत आहे. त्यामध्ये चिपळूण तालुक्याची राजकीय भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वरिष्ठ पातळीवर बदल केले आहेत.गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवून त्याजागी कोकणचे नेते सुनील तटकरे यांची नियुक्ती केल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीची पडझड काही प्रमाणात थांबेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. परंतु, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांत असणारी नाराजी दूर करण्याचे काम प्राधान्याने करावे लागणार आहे. तसेच पक्ष सोडून गेलेल्यांची समजूत काढून त्यांना सन्मानाने पक्षात आणणे हे प्रदेशाध्यक्ष तटकरेंसमोर महत्त्वाचे काम आहे. काही महिन्यांपूर्वी पक्ष सोडलेले कदम हे पक्षाबाहेरच असल्याने त्यांचे व्यक्तीगत आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. कदम यांच्याबाबत पक्षाने निवडणुकीपूर्वी स्वत:हून एक पाऊल पुढे टाकून गांभिर्याने विचार केला नाही, तर रत्नागिरी, गुहागर, चिपळूण व दापोली या विधानसभेच्या चार जागा पक्षाच्या हातून जाण्याची शक्यता अधिक आहे. दोन महिन्यांपूर्वी रायगडमधून खासदारकी लढविलेल्या कदम यांनी कोणाचेही पाठबळ नसताना गुहागरमधून १२००० मते घेतली आहेत.माजी आमदार कदम गेली ४० वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत. जिल्ह्यात त्यांचे व्यक्तीगत संबंध आहेत. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी मजबूत केली. परंतु, कामगारमंत्री भास्कर जाधव यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. ते जोपर्यंत प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत तोपर्यंत काम न करण्याची घोषणा करुन कदम यांनी पक्षत्याग केला होता. तटकरे व कदम यांचे मित्रत्त्वाचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणती तडजोड होईल, हे येणारा काळच ठरवेल. परंतु, कदम यांना दूर ठेवणे आज तरी राष्ट्रवादीला परवडण्यासारखे नाही. (प्रतिनिधी)