शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आंब्यापेक्षा वाहतूकभाडेच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:31 AM

रत्नागिरी : आंब्याच्या दरात घट हाेत चारशे ते हजार रुपये डझन विक्री सुरू आहे. मात्र, आंबापेटी पाठविण्यासाठी वाहतूकभाड्यासह जीएसटीची ...

रत्नागिरी : आंब्याच्या दरात घट हाेत चारशे ते हजार रुपये डझन विक्री सुरू आहे. मात्र, आंबापेटी पाठविण्यासाठी वाहतूकभाड्यासह जीएसटीची रक्कम आकारली जात असल्याने आंब्याच्या किमतीपेक्षा वाहतूकभाड्यासाठी जास्त रक्कम मोजावी लागत असल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांतून नोकरी-व्यवसायासाठी स्थिरावलेली मंडळी, नातेवाईक, मित्रांना आंबा भेट देतात. ऐन हंगामात आंब्याचे दर गगनाला भिडलेले असतात, त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कमी आणि बाहेरच आंब्याची निर्यात अधिक हाेते़ या काळात आंबा खरेदी करण्याकडे ग्राहकांचा फारसा ओढा नसताे़ हंगामाच्या अंतिम टप्प्यात दरात घसरण झाल्यानंतर स्थानिक बाजारपेठेत आंबा दिसायला सुरुवात हाेते़ त्यानंतर नातेवाइकांना पाठविण्यासाठी खरेदी सुरू हाेते़ सध्या आंबा चारशे ते हजार रुपये दराने विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. घरपोच आंबापेटी पाठविण्यासाठी दर मात्र उच्च असल्याने आंबा खरेदीपेक्षा पेटी पाठविण्यासाठी जास्त पैसे माेजावे लागत आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे दोन डझनचा बाॅक्स पाठवण्यासाठी २८० रुपये तर लाकडी आंबापेटीला ३० रुपये किलो, शिवाय १८ टक्के जीएसटीची रक्कम आकारण्यात येत आहे़ चार डझनचा बाॅक्स मात्र ४० रुपये किलाे, तर विदर्भात आंबा पाठविण्यासाठी ४५ रुपये किलो अधिक जीएसटीची रक्कम, तर दोन डझनच्या बाॅक्ससाठी ३०० रुपये दर आकारण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूकभाड्याची रक्कम परवडत नसल्याची प्रतिक्रिया ग्राहकांमधून उमटत आहे.

घरपोच सेवेसाठी डिलिव्हरी बाॅय तसेच वाहनचालक किलोवर दर आकारतात. शिवाय, काही ग्राहक चार डझनची पेटी सांगून त्यामध्ये पाच ते सहा डझन आंबा भरतात. साहजिकच, पेटीचे वजन वाढते. ग्राहकांकडून दिशाभूल करण्यात येत असल्यानेच वाहतूकभाड्यात वाढ करण्यात आली असून, वजनावरच पेटीचे भाडे आकारले जात आहे. दोन डझनांच्या बाॅक्सचे वजन आठ किलो भरते. त्यामुळे एकाच व्यक्तीला दोन बाॅक्स पाठविले जाणार असतील, तर ५६० रुपये दर न आकारता ग्राहकांकडून पाचशे रुपयेच घेण्यात येतात. चार डझनांची पेटी १४ ते १५ किलो, तर पाच ते सहा डझनांच्या पेटीचे वजन २२ ते २३ किलो भरते. त्यामुळे किलोसाठी दर निश्चित करण्यात आला असून, वाहतूकभाडे शिवाय जीएसटीची रक्कम आकारण्यात येत आहे.

कोट

सुरुवातीला पेटी व बाॅक्ससाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले होते. काही ग्राहक चार डझनांची पेटी सांगून पाच ते सहा डझन आंबापेटी भरून फसवणूक करतात. डिलिव्हरी बाॅय व वाहनचालक मात्र किलोवरच भाडे आकारत असल्यामुळे लमसम वाहतूकभाडे परवडत नाही. त्यामुळे किलोप्रमाणे पेटीचे वाहतूकभाडे व त्यावर जीएसटीची रक्कम आकारण्यात येत आहे.

- सुशील कुबल, कुरिअरचालक