शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाची दारे उघडतायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:34 IST

शाळांची दारे ही उघडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात नवीन शिक्षणाची दारे उघडू लागली आहेत, हीसुद्धा रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. ...

शाळांची दारे ही उघडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात नवीन शिक्षणाची दारे उघडू लागली आहेत, हीसुद्धा रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. चिपळूण तालुक्यातील मांडकी येथील प्रथमेश राजेशिर्के या विद्यार्थ्याने लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेत २३६ वी रॅंक प्राप्त केली आहे, ही खरंच काैतुकास्पद बाब आहे. काेराेना काळात शाळा बंद असूनही शिक्षण अजून थांबलेले नाही, हे मात्र नक्की आहे. प्रथमेशच्या रूपाने शैक्षणिक वाटचालीतील आणखी एक संधी मुलांसमाेर उघड झाली आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रथमेशने आयएएस अधिकारी हाेण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि त्याने ध्येय्याने तिथपर्यंत मजल मारली. यापूर्वी २००५ मध्ये संगमेश्वर येथील डाॅ. अश्विनी जाेशी या आयएएस झाल्या आहेत. तर महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेतही रत्नागिरी जिल्ह्यातील युवकांनी आपला झेंडा राेवला आहे. जिल्ह्यातील युवकांनी केलेली ही कामगिरी निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ‘नररत्नांची खाण’ म्हणून ज्या रत्नागिरीचा उल्लेख केला जात आहे. ती रत्नागिरी शैक्षणिक वाटचालीतही दैदीप्यमान कामगिरी करत आहे. जिल्ह्याची ही शैक्षणिक वाटचाल अधिक गतिमान हाेण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही विशेष पुढाकार घेतला आहे, ही बाबही अधाेरेखित करणे गरजेचे आहे. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकालात ‘रत्नागिरी शैक्षणिक हब’ बनविण्याचा त्यांनी मानस धरला आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्राची मुहूर्तमेढ त्यांनी रत्नागिरीत राेवली आहे. आता पीपीई माॅडेलवर रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबराेबर जिल्ह्यात इंजिनिअरिंग महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने देशातले पहिले रिसर्च सेंटर उभारण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. मुलांना स्कील डेव्हलपमेंट करण्यासाठी तसेच वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आयसीडीसीची शाखाही रत्नागिरीत उभारण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत काेराेनानंतर शाळांची दारे उघडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाची आणखी नवनवीन दालने उघडत आहेत. या दालनात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पाऊल टाकून त्यात यशस्वीतेचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी प्रामाणिक जिद्दीची जाेड हवी आणि या विद्यार्थ्यांना भक्कम पाठबळही हवे.

- अरुण आडिवरेकर