शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेर जिल्हा हागणदारीमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:34 IST

रत्नागिरी : स्वच्छता ही कोकणची संस्कृती असून, गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पाेहोचून मार्च २०२२पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करुया, असे आवाहन ...

रत्नागिरी : स्वच्छता ही कोकणची संस्कृती असून, गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पाेहोचून मार्च २०२२पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करुया, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केले.

सरपंच स्वच्छता संवाद या उपक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हागणदारी मुक्त रत्नागिरी जिल्हा करणार असल्याचे सांगितले. स्वच्छतेची परिभाषा, तांत्रिक पध्दत बदलत चालली आहे. गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारांची व्यवस्था तांत्रिक पध्दतीने करणे गरजेचे आहे. यामुळे जिल्हा हागणदारीमुक्त होण्यास निश्चितपणे मदत होईल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.

स्वच्छतेत रत्नागिरीचा इतिहास आहे. देशामध्ये स्वच्छतेत रत्नागिरी जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला पाहिजे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. परवडी यांनी प्रास्ताविक केले. पाणी व स्वच्छता विभागाचे व्यवस्थापक अजित माजगांवकर यांनी दहा उपक्रमांची माहिती दिली. श्रध्दा नलावडे यांनी सूत्रसंचालन केले. सर्व सरपंच, जिल्हा परिषद सभापती, पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.