शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात पाण्यासाठी वणवण

By admin | Updated: December 26, 2014 23:57 IST

जलस्रोतांमध्ये घट : भीषण पाणी टंचाईची शक्यता कायम, नवे पर्याय उपलब्ध

खेड : तालुक्यातील खेड्यापाड्यात दरवर्र्षी पाण्याची चणचण मोठ्या प्रमाणात भासते. विविध जलस्रोत उपलब्ध असताना तालुक्यात पाणीटंचाई भासते. निम्म्याहून अधिक जलस्रोत पूर्णपणे गाळात रूतले आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने खेड तालुक्यात पाण्यासाठी आटापिटा केला जात आहे. दरवर्षी कालबध्द आराखडा तयार करण्यात येतो. मात्र, वर्षानुवर्षे हा आराखडा राबविण्यात येत असला तरी अंमलबजावणीमधील अनेक त्रुटी व धोरणात्मक निर्णयाचा फटका तालुक्याला बसत आहे. त्याचाच परिणाम बहुतांश गावांत पाण्याचे साठे कमी होण्यात झाला आहे. हे साठे नियंत्रित करण्यासाठी पाणी वाचवा अभियान राबविणे आणि त्याप्रमाणे अंमल करणे आवश्यक आहे. यासाठी आतापासूनच उपलब्ध असलेले पाणीसाठे वाचविणे आवश्यक आहे. खेड तालुक्यातील खेडेगावात ३२ गावांमध्ये जानेवारीपासूनच पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष्य जाणवते. तर प्रतिवर्र्षी ४३ गावे आणि ६५ वाड्यांमध्ये ही पाणीटंचाई जाणवते. डोंगरदऱ्यातील गावांमध्ये ही समस्या अधिकच जटील झाली आहे. खवटी आणि देवाचा डोंगर तसेच तुळशीसारख्या ग्रामीण भागात जानेवारीपासूनच पाणीटंचाई उद्भवते. फेब्रुवारी महिन्यापासून तर या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. तालुक्यात नदी, ओढे, नाले व दऱ्या यांसारखे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. मात्र, अनेक ठिकाणी गाळ आहे. पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये व वाड्यांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या योजना आणि विहिरींच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याकडेच लोकप्रतिनिधींचा कल जास्त आहे. गेली १५ वर्षे येथील लोकप्रतिनिधीनी नैसर्गिक जलस्रोत विकसित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाहीत़ खेड तालुक्यातील जगबुडी नदीसह इतर छोट्या - मोठ्या नद्यांकडेही तसे दुर्लक्षच झालेले दिसते. तालुक्यातील एकमेव मोठ्या असलेल्या जगबुडी नदीवरच पाणीटंंचाई काळात मोठा भार पडत आहे़ खेड शहराला पाणी पुरवठा करणारे बोरज धरण आजही आपल्या अस्तित्त्वासाठी धडपडत आहे. या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. हा गाळ गेल्या १० वर्षांपासून काढण्याचे प्रयत्न खेड नगर पालिकेकडून होत आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि अपुऱ्या निधीमुळे बोरज धरण वर्षानुवर्षे गाळात रूतत चालले आहे. मात्र, यात नगरपालीकेतील सत्ताधाऱ्यांनी यामध्ये लक्ष घातले आहे. या धरणातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आल्याने आगामी काळात शहराला गरजेपुरते पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकेल. अठरा गाव धवडे बांदर विभागातून पावलेल्या जगबुडी नदीचा आणि शिरवली धरण व नातूवाडी धरणाच्या पाण्याचा सुकिवली येथे संगम झाला आहे. या तीन जलस्रोतांचे पाणी खेड शहरालादेखील पुरविले जात आहे. हेच पाणी पुढे खाडीपट्ट्यातील गावांना पुरविले जात आहे. साठे कमी झाल्यांनतर या भागातील जनतेला टँकरद्वारे उपलब्ध होणाऱ्या पाण्यावरच विसंबून राहावे लागत आहे़ संबंधित यंत्रणेने याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)विशेष प्रयत्नांची गरज...जलस्रोतांच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न हवेत. खेड तालुक्यात वर्षानुवर्षे परिस्थिती जै से थेलोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्यात ताळमेळ नाही.जलस्रोतांच्या संरक्षणासाठी विशेष मोहीम आवश्यक असल्याने तसे प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित. नदी, ओढे, नाले यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांसाठी अधिक प्रयत्न गरजेचे.टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या गावांची संख्या वाढतेय. नळपाणी योजनांद्वारे गावात पाण्यासाठी प्रयत्न सुरू. मात्र, अनेक ठिकाणी अशा योजनांची अवस्था बिकट. अनेक ठिकाणी गाळ तसाच.