शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

हमी भावाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST

रत्नागिरी : आंबा व काजू उत्पादनांना हमीभाव देऊन उत्पादीत माल शासनाने उत्पादकांकडून खरेदी करावा, अशी मागणी महाराष्ट्र समविचार मंचाकडून ...

रत्नागिरी : आंबा व काजू उत्पादनांना हमीभाव देऊन उत्पादीत माल शासनाने उत्पादकांकडून खरेदी करावा, अशी मागणी महाराष्ट्र समविचार मंचाकडून करण्यात आली आहे. शासनाने एकरी नुकसानाचा तपशील न करता, गुंठ्यावर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ओम शिंदे यांची निवड

खेड : येथील उदयोन्मुख खेळाडू ओम शिंदे याची आंतरराष्ट्रीय फाईट स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. श्रीनगर (काश्मीर) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये १४ ते १७ वर्ष वयोगटात ७० ते ७५ वजनी गटामध्ये सर्वोत्कृष्ट फाईट तरुण नैपुण्य त्याने मिळवले आहे. इंडोनेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे.

खाद्यपदार्थ स्पर्धा

चिपळूण : येथील रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टुरिझम महाविद्यालयात डेझर्ट व सॅण्डविच मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना चाचणी आवश्यक

रत्नागिरी : दहावी, बारावी परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी ४८ तासांसाठी वैध राहणार आहे. त्यामुळे शिक्षकांना दर दोन दिवसांनी रुग्णालयामध्ये जाऊन तपासणी करावी लागणार आहे. दिनांक २३ व २९ एप्रिलपासून दहावी - बारावीच्या परीक्षा सुरु होत आहेत.

गटारांची कामे सुरु

देवरुख : शहरातील रस्ते चांगले राहून पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी गटार बांधणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. शहरात चार ठिकाणी गटारांची कामे सुरु आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारे बांधण्यात येत आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होऊन रस्ते सुरक्षित राहणार आहेत.

चालकावर गुन्हा

दापोली : उटंबर केळशीकडून मुंबईकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीचा रावतोली येथे झाडावर आदळून अपघात झाला. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. मात्र, त्यानंतर त्याची चौकशी करुन नियमान्वये नोटीस बजावून सोडून देण्यात आले आहे.

मुख्यालय न सोडण्याचे आदेश

रत्नागिरी : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक ३० एप्रिलपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळा बंद राहणार असल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश असून, शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टँकरला मागणी

रत्नागिरी : शहरामध्ये गेले दोन दिवस पाणीपुरवठा झाला नाही. शिवाय बुधवारी काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने गेले दोन दिवस टँकरला वाढती मागणी आहे. खासगी टँकरसाठी आधी बुकिंग करावे लागत आहे. कित्येक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तर दररोज टँकर मागवावा लागत आहे.