शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

हमी भावाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:32 AM

रत्नागिरी : आंबा व काजू उत्पादनांना हमीभाव देऊन उत्पादीत माल शासनाने उत्पादकांकडून खरेदी करावा, अशी मागणी महाराष्ट्र समविचार मंचाकडून ...

रत्नागिरी : आंबा व काजू उत्पादनांना हमीभाव देऊन उत्पादीत माल शासनाने उत्पादकांकडून खरेदी करावा, अशी मागणी महाराष्ट्र समविचार मंचाकडून करण्यात आली आहे. शासनाने एकरी नुकसानाचा तपशील न करता, गुंठ्यावर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ओम शिंदे यांची निवड

खेड : येथील उदयोन्मुख खेळाडू ओम शिंदे याची आंतरराष्ट्रीय फाईट स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. श्रीनगर (काश्मीर) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये १४ ते १७ वर्ष वयोगटात ७० ते ७५ वजनी गटामध्ये सर्वोत्कृष्ट फाईट तरुण नैपुण्य त्याने मिळवले आहे. इंडोनेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे.

खाद्यपदार्थ स्पर्धा

चिपळूण : येथील रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टुरिझम महाविद्यालयात डेझर्ट व सॅण्डविच मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना चाचणी आवश्यक

रत्नागिरी : दहावी, बारावी परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी ४८ तासांसाठी वैध राहणार आहे. त्यामुळे शिक्षकांना दर दोन दिवसांनी रुग्णालयामध्ये जाऊन तपासणी करावी लागणार आहे. दिनांक २३ व २९ एप्रिलपासून दहावी - बारावीच्या परीक्षा सुरु होत आहेत.

गटारांची कामे सुरु

देवरुख : शहरातील रस्ते चांगले राहून पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी गटार बांधणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. शहरात चार ठिकाणी गटारांची कामे सुरु आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारे बांधण्यात येत आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होऊन रस्ते सुरक्षित राहणार आहेत.

चालकावर गुन्हा

दापोली : उटंबर केळशीकडून मुंबईकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीचा रावतोली येथे झाडावर आदळून अपघात झाला. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. मात्र, त्यानंतर त्याची चौकशी करुन नियमान्वये नोटीस बजावून सोडून देण्यात आले आहे.

मुख्यालय न सोडण्याचे आदेश

रत्नागिरी : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक ३० एप्रिलपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळा बंद राहणार असल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश असून, शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टँकरला मागणी

रत्नागिरी : शहरामध्ये गेले दोन दिवस पाणीपुरवठा झाला नाही. शिवाय बुधवारी काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने गेले दोन दिवस टँकरला वाढती मागणी आहे. खासगी टँकरसाठी आधी बुकिंग करावे लागत आहे. कित्येक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तर दररोज टँकर मागवावा लागत आहे.