शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -रत्नागिरी पुन्हा नागरिकांनी गजबजली, अनेक वाहने रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 15:04 IST

जनता कर्फ्यूला रविवारी १०० टक्के प्रतिसाद देणाऱ्या रत्नागिरीकरांनी सोमवारी मात्र बेपर्वाईचे दर्शन घडविले. ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही रत्नागिरीत सोमवारी सकाळपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळ पुन्हा सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे नागरिकही खरेदीसाठी घराबाहेर, वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईतीन तासात ६०० वाहन चालकांवर कारवाई

रत्नागिरी : जनता कर्फ्यूला रविवारी १०० टक्के प्रतिसाद देणाऱ्या रत्नागिरीकरांनी सोमवारी मात्र बेपर्वाईचे दर्शन घडविले. ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही रत्नागिरीत सोमवारी सकाळपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळ पुन्हा सुरू झाली आहे.

सगळीकडे १४४ कलम लागू असल्याने गर्दी होऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून मोठी कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सकाळपासून केवळ तीन तासात पोलिसांनी जवळजवळ ६०० वाहन चालकांवर कारवाई केली.रविवारी जनता कर्फ्यूला रत्नागिरीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवार असल्याने बहुतांशी लोक घराबाहेर पडलीच नव्हती. त्यामुळे सर्वत्र सामसूम होते. लोकांची गर्दी होऊ नये यासाठी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाचे गांभीर्य रत्नागिरीकरांना नसल्याचे दिसून आले.

लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन करूनही अनेकजण सकाळी घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेकजण फिरायला बाहेर पडल्याचेही विदारक चित्र पाहायला मिळाले. अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात आलेली असतानाही अनेकजण बेफिकीरपणे विनाकारण घराबाहेर पडले होते.कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडलेल्या सर्वांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. वाहनचालकांना थांबवून त्यांना विचारणा करण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी वाहन्यांची तपासली पोलिसांकडून होत असल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.रत्नागिरी शहरात सोमवारी सकाळी तब्बल ६०० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. लोकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन करुन सुध्दा लोक गर्दी करु लागलेत. त्याचबरोबर नियम धाब्यावर बसवून रत्नागिरी शहरातील गाडीतळ, परटवणे एस्. टी. स्टॅण्ड, आठवडा बाजार, मारुती मंदिर, नाचणे - गोडावून स्टॉप या परिसरात सर्वच रिक्षा थांब्यावर रिक्षा व्यवसाय सुरू आहेत.शहरातील सर्व रिक्षा वाहतूक तातडीने बंद करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यानुसार रिक्षाचालकांवरही कारवाई करण्याचे संकेत देण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात सुरू त्यामुळे आता पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तरी लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीtraffic policeवाहतूक पोलीस