शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

corona virus -रत्नागिरी पुन्हा नागरिकांनी गजबजली, अनेक वाहने रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 3:00 PM

जनता कर्फ्यूला रविवारी १०० टक्के प्रतिसाद देणाऱ्या रत्नागिरीकरांनी सोमवारी मात्र बेपर्वाईचे दर्शन घडविले. ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही रत्नागिरीत सोमवारी सकाळपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळ पुन्हा सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे नागरिकही खरेदीसाठी घराबाहेर, वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईतीन तासात ६०० वाहन चालकांवर कारवाई

रत्नागिरी : जनता कर्फ्यूला रविवारी १०० टक्के प्रतिसाद देणाऱ्या रत्नागिरीकरांनी सोमवारी मात्र बेपर्वाईचे दर्शन घडविले. ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही रत्नागिरीत सोमवारी सकाळपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळ पुन्हा सुरू झाली आहे.

सगळीकडे १४४ कलम लागू असल्याने गर्दी होऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून मोठी कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सकाळपासून केवळ तीन तासात पोलिसांनी जवळजवळ ६०० वाहन चालकांवर कारवाई केली.रविवारी जनता कर्फ्यूला रत्नागिरीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवार असल्याने बहुतांशी लोक घराबाहेर पडलीच नव्हती. त्यामुळे सर्वत्र सामसूम होते. लोकांची गर्दी होऊ नये यासाठी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाचे गांभीर्य रत्नागिरीकरांना नसल्याचे दिसून आले.

लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन करूनही अनेकजण सकाळी घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेकजण फिरायला बाहेर पडल्याचेही विदारक चित्र पाहायला मिळाले. अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात आलेली असतानाही अनेकजण बेफिकीरपणे विनाकारण घराबाहेर पडले होते.कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडलेल्या सर्वांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. वाहनचालकांना थांबवून त्यांना विचारणा करण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी वाहन्यांची तपासली पोलिसांकडून होत असल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.रत्नागिरी शहरात सोमवारी सकाळी तब्बल ६०० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. लोकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन करुन सुध्दा लोक गर्दी करु लागलेत. त्याचबरोबर नियम धाब्यावर बसवून रत्नागिरी शहरातील गाडीतळ, परटवणे एस्. टी. स्टॅण्ड, आठवडा बाजार, मारुती मंदिर, नाचणे - गोडावून स्टॉप या परिसरात सर्वच रिक्षा थांब्यावर रिक्षा व्यवसाय सुरू आहेत.शहरातील सर्व रिक्षा वाहतूक तातडीने बंद करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यानुसार रिक्षाचालकांवरही कारवाई करण्याचे संकेत देण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात सुरू त्यामुळे आता पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तरी लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीtraffic policeवाहतूक पोलीस