शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 09:34 IST

मोकळ्या जागा मोकळ्याच राखणं आपल्यासाठी, भविष्यासाठी का महत्त्वाचं आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण कधीतरी थोडा वेळ काढला आहे का?

अभिलाष खांडेकररोव्हिंग एडिटर, 'लोकमत'

कडक उन्हाळा सुरू झाला आहे. लवकरच उन्हाच्या झळा आणखी तीव्र होत जातील. दिवसेंदिवस तीव्र होत चाललेली हवामानबदलाची परिस्थिती आणि तापमानवाढीचे धोके वाढत जातील, याचं महत्त्वाचे कारण म्हणजे आपण तापमानवाढ रोखण्यासाठी जे करायला हवं त्यातलं काहीच करत नाही. भारतातील शहरांमधून  मोकळ्या जागा वेगाने नष्ट होत चालल्या आहेत, त्याचे कारण चुकीची धोरणं हे तर आहेच; पण पुढील पन्नास सोडाच, पण पाच वर्षांसाठीही दूरदृष्टी नसणं हे आहे. चांगल्या भविष्यासाठी मोकळ्या जागा मोकळ्याच ठेवणे हाही विकासच आहे, हे  अधिकाऱ्यांना पटवून देणं कर्मकठीण बनलं आहे. चकचकीत मॉल्स, प्रचंड आकाराचे ऑफीस कॉम्प्लेक्स, गरज नसताना उभी केलेली मेट्रो स्थानकं आणि मोकळ्या जागांवर बांधलेले सिमेंट काँक्रीटचे रस्ते म्हणजेच विकास अशी एक चुकीची व्याख्या घट्ट होत चालली आहे.

प्रचंड शहरीकरण झालेल्या भागातील मोकळ्या जागा म्हणजे शहरांच्या ‘लाइफलाइन्स’ आहेत. स्मार्ट सिटीज, ग्रोथ इंजिन्स अशा नावाखाली शहरांचा वेगाने विस्तार होत असताना लहान मोठ्या बागा, मैदानं, शाळांची क्रीडांगणं आणि ‘कॉमन लँड्स’ अशा मोकळ्या जागांवर सरकारं आणि खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांकडून कब्जा केला जात आहे. इंदूरमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली लहान मुलांसाठीच्या सगळ्यात मोठ्या बागेच्या जागी प्रचंड मोठी कार्यालयीन इमारत उभी राहिली आहे. 

मोकळ्या जागा मानवजातीसाठी का महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण कधी वेळ काढला आहे का? हवामानबदल आणि दिवसेंदिवस आक्रसत चाललेली शहरं या पार्श्वभूमीवर त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे कठोर कायदे आणि राजकीय इच्छाशक्तीच्या आधाराने त्या मोकळ्या जागा जपल्या पाहिजेत. मोकळ्या जागा नष्ट करणं, जुन्या विहिरी बुजवणं, नद्या आणि इतर जलस्रोत नष्ट करणं;  हे करून भविष्यातील संकटकाळात फक्त पश्चात्ताप नशिबी येईल.

मे अखेरपर्यंत भारतभर पाणी टंचाई तीव्र होत जाईल. माणसं प्लॅस्टिकच्या टाक्या, पिंपं घेऊन पाण्याच्या टँकरकडे डोळे लावून बसलेली दिसतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी मार्चमध्ये नवीन बोअरवेल्स खणण्यावर बंदी घालत असल्याचे इशारे दिले आहेत, कारण त्यांना भूजल पातळीची चिंता सतावत आहे. भूजलाची चिंता त्यांनी यापूर्वीच करायला हवी होती. पण तहान लागल्यावर विहीर खणण्याची एक पद्धतच पडून गेली आहे. शेती, उद्योग, शहरीकरणाच्या वाढत्या गरजा आणि इतर अनेक कारणांमुळे अतिवापर होऊन भूजलाची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. आपल्या जलस्रोतांची काळजी घेण्यासाठी सरकारनेही फार काही केलेलं नाही. मोकळ्या जागा या कोणत्याही शहरासाठी किंवा गावासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या हवामान नियंत्रणासाठी मदत करतात. पावसाळ्यात भूजल पुनर्भरणास मदत करतात. सुमारे एक एकर किंवा त्यापेक्षा कमी मोकळ्या जमिनीचं योग्य व्यवस्थापन केल्यास झाडं, गवत आणि स्वच्छता राखल्यास मुलांना, ज्येष्ठांना तिचे अनेक उपयोग होऊ शकतात. मागील ५० वर्षांत अनेक मोठ्या बागा, विहिरी, तळी आणि तलाव आपल्या डोळ्यांसमोर नाहीसे होत गेले. वाढत्या लोकसंख्येचा ताण आणि उदासीनता यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. तापमान वाढलं आहे आणि सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झालं आहे. केंद्रीय भूजल मंडळाची स्थापना १९८६ मध्ये झाली; पण तांत्रिक, कायदेशीर उपाययोजना असूनही भूजलाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकटच होत गेली आहे. मोकळ्या जागांवर सिमेंट काँक्रीटचे थर लावण्याची आणि त्याच काँक्रीटचे रस्ते बांधण्याचे ‘फॅड’ या समस्यांमध्ये भर घालत आहे.

तज्ज्ञ सांगतात, मुंबईच्या ९५ टक्के भूभागावर काँक्रिटीकरण झाले आहे, त्यामुळे पावसाचे पाणी मुरायला जागा नाही आणि शहरात पूर येतात. नीति आयोगासारख्या धोरणकर्त्यांनी राज्यांना ‘मोकळ्या जागा हाच विकास माना’ असे आदेश दिले तरच भविष्याकडून काही अपेक्षा ठेवण्यास वाव आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Save open spaces amidst concrete jungles for a better future.

Web Summary : Cities are losing vital open spaces due to flawed policies. Prioritizing malls and concrete roads over gardens and fields exacerbates water scarcity and climate change. Protecting these spaces is essential for a sustainable future, requiring strong laws and political will.
टॅग्स :weatherहवामान अंदाज