शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २४ तासांत ११५ नवे रुग्ण; २९ जणांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११५ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून २९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ...

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११५ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून २९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ५६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत ७५ हजार ८६२ रुग्ण बाधित झाले आहेत. त्यापैकी ७२ हजार ३६९ जण बरे झाल्याने त्यांना सोडण्यात आले आहे तर आतापर्यंत २३४२ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. सध्या ११५५ रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही कमी-जास्त होत आहे. मंगळवारी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात ११५ कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यात आरटीपीसीआर चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ६८ तर २३८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अँटिजन चाचणीत १६०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ४७ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

२४ तासांत २ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्याआधीच्या २७ रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. त्यामुळे एकूण २९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद एकाच दिवशी करण्यात आली आहे. बरे झालेल्या ५६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९५.४१ टक्के इतकी आहे तर मृत्यूची टक्केवारी ३ टक्के इतकी झाली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ५० व त्यावरील जास्त वयोगटांतील मृत्यू झालेल्या १९६६ रुग्णांचा समावेश असून ८२५ सहव्याधी असलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

सध्या जिल्ह्यातील कोविड रुग्णालय तसेच केअर सेंटरमध्ये एकूण १०७४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी लक्षणे असलेले रुग्ण २६५ असून लक्षणे नसलेल्यांची संख्या ८०९ इतकी आहे. होम आयसोलेशनमध्ये ४७० रुग्ण उपचार घेत आहेत.