शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

ई-रिक्षाला लवकरच मान्यता मिळणार?, माथेरानमध्ये आनंदाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 11:51 PM

ई-रिक्षा सेवा सुरू करण्याबाबतच्या प्रश्नाला सर्वोच्च न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने पिढ्यान्पिढ्या हातरिक्षा ओढण्याचा व्यवसाय करणाऱ्या श्रमिकांमध्ये आंनदाचे वातावरण दिसत आहे.

माथेरान : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ई-रिक्षा सेवा सुरू करण्याबाबतच्या प्रश्नाला सर्वोच्च न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने पिढ्यान्पिढ्या हातरिक्षा ओढण्याचा व्यवसाय करणाऱ्या श्रमिकांमध्ये आंनदाचे वातावरण दिसत आहे.गेल्या वर्षी ई-रिक्षाचे प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या श्रमिक रिक्षा संघटनेच्या ई-रिक्षाच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने राज्य व केंद्र सरकारला तीन आठवड्यात ई-रिक्षाबाबत निवेदन सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती अरुण मिश्रा व न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान आधुनिक युगात प्राचीन काळातील वाहतूक व्यवस्था कशी सुरू राहते, याबद्दल न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी नाराजी व्यक्त केली. राज्य व केंद्र सरकारला नोटीस जारी करण्यात आल्या व तीन आठवड्याच्या मुदतीत निवेदन सादर करण्याचे आदेश दिले. रिक्षा संघटनेच्या बाजूने वकील ललित मोहन व जॉन्सन सुब्बा यांनी युक्तिवाद केला.आजवर ब्रिटिशकालीन गुलामगिरीप्रमाणे येथील श्रमिक हातरिक्षाचालक आपल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाकरिता झटत आहेत. रक्ताचे पाणी या अतिकष्टदायक श्रमातून होत आहे, त्यामुळेच आजवर अनेक जण अल्पायुष्यात मरण पावले आहेत. या जोखडातून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी, यासाठी श्रमिक हातरिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी मागील पाच वर्षांपासून स्वखर्चाने शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला आहे. वाहनबंदीच्या नावाखाली सुरू असलेले मजुरांचे शोषण निश्चितच थांबेल, असा विश्वास सुनील शिंदे यांनी व्यक्त के ला आहे.