शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

आपत्ती व्यवस्थापनची पेणमध्ये कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 12:27 AM

चार धरणांतील पाण्याचा विसर्ग निर्माण करतो पूरपरिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कपेण : मान्सूनचे आगमन वेळेवरच होणार असल्याने रायगड जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जागी झाली आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी यासंदर्भात व्हिडिओकॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन अधिकारी वर्गाशी आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार हे गृहीत धरून तातडीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबतीत आढावा घेतला.

पेणमध्ये हेटवणे आंबेघर शहापाडा व बाळगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून हंगामात पाण्याचा होणारा विसर्ग यामुळे भोगावती, बाळगंगा, नद्यांच्या पातळीत होणारी धोकादायक वाढ यामुळे पेण ग्रामीण भागातील पूरपरिस्थितीसाठी हाताळणे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या आवाक्याबाहेर असते. यामुळे पेणच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. यावर्षी मान्सून हंगामात हवामानशास्त्र विभागाने सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यानुसार जून महिन्यात १०६ टक्के, जुलैमध्ये ९९ टक्के, ऑगस्ट महिन्यांत, ९७ टक्के व सप्टेंबर महिन्यात ११६ टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर दुसरीकडे समुद्राला १८ दिवस हायटाइड उधाण भरतीच्या ४.७८ मीटर पाणी पातळीत वाढ होईल. नद्यांच्या धोकादायक पूररेषेत भोगावती नदीकाठी पेण शहर, अंतोरे, नवघर, पाटणोली, सापोलीबेडी, कणे, भोगावती नदीचा प्रवाहासमोर कणे गाव येत असल्याने या खाडीकिनारचा संरक्षक बंधारा वेगवान प्रवाहाच्या धडकेने फुटतो आणि अखंड गाव पुराने वेढले जाते. या नदीपात्रात आंबेघर व हेटवणे धरणाच्या पाण्याचा विसर्ग व आपत्कालीन परिस्थितीत धरणाचे उघडले जाणारे दरवाजे अशा परिस्थितीत या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने आताच संभाव्य उपाययोजना केल्या पाहिजेत. दुसरीकडे दक्षिण बाजूकडील शहापाडा धरणातील पाणीसाठा लवकर जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात ओव्हरफ्लो होऊन ते पाणी वाशी नाका मार्गे कणे खाडीत येत असल्याने परिस्थिती भयानक बनते. रहदारीचे मार्ग बंद होतात. यात आणखी भर पडते ती पावसाळी येणाऱ्या उधाण भरतीच्या पाणीपातळीची भरतीची पाणीपातळी नद्यांच्या प्रवाहाला अडविणे आणि पुराच्या पाण्याची पातळी होत्याच नव्हते करते. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसमोर ही मोठी जबाबदारी आहे.

बाळगंगा नदीकिनारी उपाययोजना आवश्यक बाळगंगा नदीकिनारी खरोशी दूरशेत, जिते तर पातालगंगा नदी प्रवाह दुष्मी, खारपाडा, जिते, यावे, जोहे, तांबडशेत, दादर या गावांना वेणीत जात अरबी समुद्रात विसावते. धरणे, नद्यांच्या पट्ट्यातील येणार पाणी आणि समुद्राला येणारी उधाण भरती यांचा ताळमेळ योगायोग जुळून येत असल्याने पेण शहर व ग्रामीण भागातील नदी व खाडी किनारी भागात मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Raigadरायगड