शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रायगड जिल्ह्यात कचऱ्याचा भस्मासुर, दुर्गंधीने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:30 AM

रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी ठोस आणि सक्षम यंत्रणा नाही.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी ठोस आणि सक्षम यंत्रणा नाही. गाव आणि शहर स्वच्छ होत असली तरी, दुसरीकडे मात्र ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिग जमा होताना दिसत आहेत. सातत्याने साठणाºया कचºयामुळे परिसरांमध्ये पसरणाºया दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा गंभीर परिणाम होत आहे.१५ तालुके आणि सुमारे ८०६ ग्रामपंचायती असलेल्या रायगड जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे २७ लाखाच्या आसपास आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, पाली-सुधागड हे तालुके पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत होत आहेत. त्याचप्रमाणे याच तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये पर्यटकांच्या सोयी सुविधेसाठी कॉटेज उभारण्यात आली आहेत. जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने स्टील, केमीकल, खत निर्मिती यासह अन्य छोटे-मोठ्या उद्योगांचे जाळे उभे राहीले आहे. जिल्हा विकासाच्या वाटेवर असला तरी, जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रोज निर्माण होणाºया कचºयाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.गावांसह शहरांमध्ये दैनंदीन कचरा निर्माण होत आहे. तो उचलण्यासाठी संबंधीत ग्रामपंचायती आणि नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महापालिका त्यांच्यामाध्यमातून काम करत आहेत. रोजच्या रोज शहरे गावे ही स्वच्छ केली जातात. मात्र स्वच्छता करता निर्माण होणार कचरा हा अनाधिकृत निर्माण केलेल्या डंपीग ग्राऊंडवर टाकण्यात येत आहे. बहुतांश ग्रामपंचायतींकडे आणि नगरपालिकेकडे स्वत:च्या मालकीचे डंपींग ग्राऊंड नाही शिवाय रोज निर्माण होणाºया कचºयावर प्रक्रीया करण्याची सक्षम यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे दिसून येते.कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्याच स्तरावरुन विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे कचºयाचा भस्मासूर सातत्याने वाढतच चालला आहे. वाढणाºया कचºयामुळे परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. अनाधिकृतपणे निर्माण केलेल्या डंपींग ग्राऊंड शेजारुन जाताना नाकाला रुमाल लावूनच जावे लागत असल्याने नागिरकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे.आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कारखानदारी वाढलेली आहे. त्यामध्ये केमीकल वेस्टचेही प्रमाण जास्त आहे. बहुतांश कंपन्यांमार्फत केमीकल वेस्टवर प्रक्रिया न करता ते पाणी नदी, खाडी आणि समुद्रामध्ये सोडले जाते. याबाबत गाव पातळीवरुन ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते विरोधी भूमिका मांडतात. मात्र पुन्हा तोच प्रकार सुरु राहतो. या प्रकारामुळे नद्या, समुद्रातील पाण्याचे प्रदूषण होत असल्याने त्यातील जैव संपादेला धोका निर्माण होत आहे.>जिल्ह्यात सहाहजार टन कचरारायगड जिल्ह्यामध्ये सुमारे सहा हजार टन कचरा निर्माण होत आहे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही, तसेच डम्पिंग ग्राउंडही नाही. त्यामुळे कचºयाची समस्या निर्माण होत आहे. एखाद्या नवीन प्रकल्पासाठी लागणाºया जमिनीच्या संपादनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जातो. तसा प्रयत्न सरकार आणि प्रशासकीय पातळीवर डम्पिंग ग्राउंडसाठी लागणाºया जमिनीच्या संपादनासाठी होताना दिसत नाही.