शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : रायगडमध्ये फडकला महायुतीचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 3:47 AM

Maharashtra Election 2019: शेकापचा सफाया ;अलिबाग, महाड, कर्जत शिवसेनेकडे; तर पेण, पनवेल भाजपकडे

- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघापैकर सहा मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकला आहे, तर एक विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्याकडे रोखण्यात यश मिळवले आहे. महायुतीच्या झंझावातापुढे शेकापचा सुपडा साफ झाला, तर जिल्ह्यात काँग्रेस औषधालाही उरलेली नसल्याचे निकालावरून स्पष्ट होते.

पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी, कर्जतमध्ये शिवसेनेचे महेंद्र थोरवे, पेण मतदारसंघातून भाजपचे रवींद्र पाटील, अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी, महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले आणि श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी बाजी मारली आहे. राज्यात विरोधकांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या विरोधात चांगलेच वातावरण पेटवले होते. मात्र, मतदारांनी महायुतीच्याच बाजूने कौल दिला आहे. शेकापला या निवडणुकीत महायुतीने धूळ चारली आहे. त्यांनी उभा केलेला एकही उमेदवार निवडून आलेला नाही, त्यामुळे जिल्ह्यातील शेकापच्या अस्तित्वावर आपोपच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्े आहे. शिवसेनेने अलिबागची जागा शेकापकडून, तर कर्जतची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिसकावली. महाडची जागा राखताना मात्र उरणची जागा गमावली आहे.

भाजपने पनवेलची जागा कायम ठेवतानाच पेणची जागा शेकापकडून घेतली आहे, तसेच उरणमधील शिवसेनेच्या ताब्यातील जागेवर भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी वर्चस्व मिळवत युतीलाच धक्का दिला आहे. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपली जागा राखली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक नुकसान कोणाचे झाले असेल तर ते शेकापचे आहे. शेकापचे चारही उमेदवार पराभूत झाले आहेत. काँग्रेससाठी ही निवडणूक ‘करो या मरो’ अशीच होती. मात्र, काँग्रेसने महाड वगळता कोणत्याच मतदारसंघात लक्षात राहील अशी कामगिरी केलेली दिसत नाही. जिल्ह्याला आता अलिबाग, उरण, पेण, कर्जत, श्रीवर्नधन या पाच मतदारसंघातून नवीन आमदार लाभले आहेत. तर पनवेल, महाडमध्ये मतदारांनी जुन्याच आमदारांना पुन्हा संधी दिल्याने भाजपचे प्रशांत ठाकूर आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांना हॅट्ट्रिक साधता आली आहे. जनतेने दिलेला कौल शेकापसह काँग्रेसनेही मान्य केला आहे. यापुढे शेकापला आणि काँग्रेसलाही पराभवाची कारणे शोधतानाच आत्मपरीक्षण करावे लागेल, एवढे मात्र निश्चित आहे.

राष्ट्रवादीकडे श्रीवर्धन; उरण अपक्षाकडे

श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी बाजी मारली आहे. तर उरण मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी निवडून आल्याने आता उरण मतदारसंघ अपक्षाकडे गेला आहे. राज्यात विरोधकांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या विरोधात चांगलेच वातावरण पेटवले होते. मात्र, मतदारांनी महायुतीच्याच बाजूने कौल दिल्याने रायगडमध्ये महायुतीने बाजी मारली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019uran-acउरणshrivardhan-acश्रीवर्धनpanvel-acपनवेलShiv SenaशिवसेनाBJPभाजपा