शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

आगरदांडा बंदराचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:07 PM

रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम ६० टक्के पूर्ण; विकासकामामुळे स्थानिकांना मिळणार रोजगार; रेल्वेमार्गाचे कामही लवकरच

मुरुड जंजिरा : केंद्र व राज्य शासनाची गुंतवणूक असणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून २०२० पर्यंत आगरदांडा बंदरातील सर्व कामे पूर्ण होतील व दिघी बंदराप्रमाणे या ठिकाणीसुद्धा मोठ्या जहाजांची रेलचेल सुरू होणार आहे. सुमारे ३५०० कोटींची गुंतवणूक असणाºया आगरदांडा व दिघी प्रकल्पामध्ये जेएनपीटीच्या धर्तीवर या बंदराच्या विकासावर भर दिला जात असून बंदराला आवश्यक असणारी सर्व कामे पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यावर प्रशासनाचा जोर दिसून येत आहे.आगरदांडा येथून मोठ्या जहाजातून उतरणारा माल विविध ठिकाणी पोहोचविण्यासाठी आगरदांडा ते इंदापूर रस्त्याच्या काँक्रिट चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू असून ६० टक्के काम आतापर्यंत झाले आहे. सावली ते मांदाड पुलापर्यंत काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर तळे ते इंदापूरचेसुद्धा काम प्रगतिपथावर आहे.आगरदांडा हे गाव पूर्वीपासून वसलेले असून चौपदरीकरणात स्थानिकांच्या घराला धक्का पोहोचू नये, यासाठी डोंगर फोडून अंतर्गत भुयारी मार्गाद्वारे थेट कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आगरदांडा येथून रोहा येथे रेल्वे रूळ टाकण्याचासुद्धा बंदर विकासात समावेश असून पुढील टप्यात हे काम मार्गी लागणार आहे.आगरदांडा बंदर जेएनपीटी हस्तांतरित करणार, असा कल होता. परंतु आता सदरचे बंदर अदानी ग्रुप आॅफ इंडस्ट्रीज् घेणार असल्याचे दिघी पोर्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बंदराच्या विकासाठी लागणाºया सर्व पूरक बाबी तातडीने पूर्ण करण्याचा केंद्र शासनाचा कल आहे. काँक्रिट रस्त्याप्रमाणे लवकरच रेल्वे विकासाचे कामसुद्धा मार्गी लागणार आहे. जहाजातून उतरवलेला माल रेल्वे व रस्त्याद्वारे नियोजित ठिकाणी पोहोचविण्यासाठी पूरक मार्ग पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. दिघी आगरदांडा बंदर संपूर्ण विकसित झाल्यावर मुरुड तालुक्याचे महत्त्व वाढणार असून नवीन औद्योगिक क्रांती होणार आहे. स्थानिकांना रोजगार देण्यात येणार आहे.जहाजातून माल उतरवण्याची लागणारी विविध पदेसुद्धा येथे भरली जाणार आहेत. बंदराच्या विकासावर केंद्र सरकार कोट्यवधींची गुंतवणूक करून एक मोठे विशाल बंदर विकसित करीत आहे. बंदराच्या विकासामुळे स्थानिकांना चांगले रस्ते त्याचप्रमाणे रेल्वे सुविधेचा लाभ मिळणार आहे. रस्त्याची कामे पूर्ण होताच रेल्वेच्या कामाला गती येणार आहे. सदरचे बंदर लवकरच विकसित होऊन स्थानिकांना रोजगार मिळावा, अशी अपेक्षा स्थानिक सुशिक्षित तरुणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.सध्या दिघी पोर्टचे काम काही अंशी पूर्ण झाले असून येथे तुरळकच जहाजे येतात. परंतु आगरदांडा बंदराचा विकास झाल्यास मोठ्या जहाजांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे मुरुड तालुक्याच्या नावलौकिकात भर पडणार आहे. काँक्रिट रस्त्याची कामे वेगाने सुरू असून बदलत्या घडामोडीमुळे लवकरच बंदर परिसराचा कायापालट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.