शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:36 IST

रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्ण विविध उपचार घेण्यासाठी येतात.

अलिबाग : रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्ण विविध उपचार घेण्यासाठी येतात. मात्र, सध्या याच सरकारी रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी कचरा, वाया गेलेले अन्न, बाटल्या, गुटख्याच्या पुड्या, नाल्यावरील तुटलेली झाकणे यामुळे दुर्गंधी पसरल्याने रुग्णासह त्यांच्या नातेवाइकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालय प्रशासनाने तातडीने यामध्ये सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य नागरिक विविध आजारांवरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयामध्ये येतात. अलोपॅथी उपचार पद्धतीबरोबरच, आयुष विभागाच्या माध्यमातून उपचार केले जातात. दररोज येथे उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या ही सुमारे ५०० च्या आसपास आहे. त्यातील गंभीर रुग्णांवर उपचार करणे गरजेचे असल्याने त्यांना रुग्णालयात भरती केले जाते. त्यामुळे येथे येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या संख्येचा विचार केल्यास या ठिकाणच्या परिसराचा, स्वच्छतागृहाचा, कॉरिडोरचा वापर केला जातो. त्यामुळे सहाजिकच या ठिकाणी कचरा, फेकलेले अन्न, बाटल्या, सिगारेटची पाकिटे, गुटख्याच्या पुड्या अशा प्रकारचा कचरा जमा होतो.
रुग्णालयाचा वापर मोठ्या संख्येने होत असल्याने तेथील स्वच्छताही सातत्याने राखली जाणे गरजेचे आहे. मात्र, ठिकठिकाणी पडलेल्या कचºयामुळे दुर्गंधी पसरली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूकडे तर घाणीचे साम्राज्य असल्याने तेथे काही क्षण उभे राहणेही मुश्कील झाले आहे. याच ठिकाणी बाहेरून उपचारासाठी येणाºया रुग्णांच्या नातेवाइकांना आसरा घ्यावा लागत असल्याचे दिसून येते. दरम्यान, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
>या ठिकाणी उपचार घेण्यासाठी सर्वसामान्य गरजू रुग्ण येतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कोणीच येत नाही, त्यामुळे महत्त्वांच्या बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी ‘लोकमत’ला सांगितले. आमच्या रुग्णाला येथे बरा करण्यासाठी आणले आहे. मात्र, येथील घाणीमुळे अन्य आजार जडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
>वॉर्डमध्ये दुर्गंधी
रुग्णालयातील स्वच्छतागृहांचीही पुरती वाट लागलेली असल्याने तेथील साफसफाई नियमित होते का? असाच प्रश्न पडत आहे. पहिल्या आणि दुसºया मजल्यावरील वॉर्डमध्येही दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आल्या आहेत.
तळमजल्यावर पिण्याच्या पाण्याची ज्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणीही अस्वच्छता असल्याचे दिसून येते. परिसरातील नाल्यावरील झाकण तुटलेली असल्याने अपघातीची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे डासांचे प्रमाण वाढल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना त्याचा अधिक त्रास होत आहे.
लाइटचे बोर्डही उघडे असल्याने शॉक लागण्याची शक्यता आहे. रुग्णांना विविध योजनेची माहिती मिळावी, यासाठी उभारण्यात आलेले डिजिटल बोर्डही बंद अवस्थेमध्ये आहे. इमारतीचे जागोजागी प्लास्टर गळून पडले आहे.