शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नव्यांना संधी देणार

By admin | Updated: September 18, 2014 12:35 IST

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे किमान 55 ते 6क् उमेदवार बदलण्यात येतील अशी शक्यता आहे. गेल्यावेळी काँग्रेसने गमावलेल्या जागांवर अनेक नव्या चेह:यांना संधी दिली जाणार आहे.

यदु जोशी - मुंबई
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे किमान 55 ते 6क् उमेदवार बदलण्यात येतील अशी शक्यता आहे. गेल्यावेळी काँग्रेसने गमावलेल्या जागांवर अनेक नव्या चेह:यांना संधी दिली जाणार आहे. 
2क्क्9 च्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडीमध्ये 174 जागा लढविल्या होत्या, त्यापैकी 82 जागा जिंकल्या होत्या. 92 ठिकाणी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या 92 पैकी केवळ 35 ते 4क् जणांनाच पुन्हा संधी दिली जाईल. इतरांचा पत्ता कट होईल, असे समजते.
निवडून आलेल्या 82 आमदारांपैकी अशोक चव्हाण आणि राजीव सातव अलिकडे खासदार झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी दोन दिवसांपूर्वी आमदारकीचा आणि काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे तीन ठिकाणी नव्या चेह:यांना संधी मिळेल. 
      विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट द्यावे, अशी शिफारस केंद्रीय छाननी समितीने केंद्रीय निवड मंडळाकडे केलेली होती. तथापि, सरसकट सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी कशासाठी? नव्या चेह:यांचा विचारदेखील झाला पाहिजे, असे मत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवड मंडळाच्या बैठकीत व्यक्त झाल्यानंतर काही विद्यमान आमदार बदलण्याबाबत विचार सुरू झाला आहे. मात्र आता ऐनवेळी असे बदल करणो योग्य ठरणार नाही, असाही एक विचारप्रवाह आहे. 
  गेल्यावेळी पराभूत झालेल्या उमेदवारांना पुन्हा संधी नाकारताना काही निकष आणि कसोटय़ा लावण्यात आल्या आहेत. पराभवानंतर उमेदवार गेली पाच वर्षे मतदारसंघात कितपत सक्रिय होते आणि पक्षाचे कार्यक्रम राबविण्यात ते सक्रिय होते का,  या बाबी तपासून पाहण्यात आल्या. 
पराभवाचे अंतर 15-2क् हजारापेक्षाही अधिक असेल आणि आता त्या मतदारसंघात पर्यायी चांगला उमेदवार असेल तर त्याला संधी देऊन आधीच्याला विश्रंती दिली जाणार आहे. मोठय़ा फरकाने पराभव होवूनही पर्यायी उमेदवार नसेल तर आधीच्या उमेदवाराला पुन्हा संधी देण्याशिवाय पक्षाकडे पर्याय नसेल. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसने 1क् जागा वाढवून दिल्या तर काँग्रेस 164 जागा लढेल. त्या परिस्थितीतही काँग्रेस जवळपास 5क् ते 55 उमेदवार बदलेल, अशी शक्यता आहे.  
 
भोकरमधून अमिता चव्हाण?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प}ी अमिता चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. इतरांप्रमाणो नेत्यांच्या नातेवाइकांना उमेदवारी देण्याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय निवड मंडळ घेईल. त्यात उद्योग मंत्री नारायण राणो आणि माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या मुलांचाही समावेश आहे.