शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

महाड एमआयडीसीतील बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:43 IST

जॅकवेलचे काम मात्र अपूर्ण; अतिवृष्टी, लांबलेल्या पावसामुळे कामास विलंब

- सिकंदर अनवारे

दासगाव : महाड औद्योगिक विकास महामंडळाकडून औद्योगिक क्षेत्रात सावित्री संगम परिसरात कांबळे तर्फे महाड गावाच्या हद्दीत बंधारा बांधण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. बंधाºयाचे काम पूर्णत्वास आले असून, अद्याप जॅकवेलचे काम मात्र अपूर्ण आहे. यामुळे सध्या तरी जुन्या जॅकवेलवरून पाणी उचले जात असल्याने दूषित पाण्याची समस्या मात्र कायम राहिली आहे. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक परिसरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार आहे.

महाड एमआयडीसीमधील औद्योगिक क्षेत्राला पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा आहे. सावित्री संगम परिसरात जॅकवेल आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे. मात्र, ज्या ठिकाणी हे पाणी उचलले जाते, त्या ठिकाणी टेमघर नाल्यातील दूषित पाणी मिसळले जाते. यामुळे अनेक वेळा औद्योगिक परिसरातील नागरिकांना रंगीत पाणीपुरवठा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे हे जॅकवेल अन्य ठिकाणी स्थलांतर करावे, अशी मागणी सातत्याने करण्यात आली. सावित्री संगम परिसरात कांबळे तर्फे महाड या गावाच्या हद्दीत नवीन बंधाºयाला सन २०१७ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानुसार हे काम व्हीयूबी कन्स्ट्रक्श्न कंपनीला देण्यात आले. यामध्ये बंधारा, नवीन पाइपलाइन, जॅकवेल, पॅनलरूम, रस्ता, या सुविधांचा समावेश आहे.

सन २०१७ मध्ये या कामाला मंजुरी प्राप्त झाल्यानंतर सावित्री नदीवर हा बंधारा बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. या कामाकरिता ११ कोटी ४३ लाख ६० हजार ११० इतकी रक्कम मंजूर झाली आहे. त्यानुसार जवळपास ९० टक्के रक्कम संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आली आहे. हे काम पूर्ण करण्याचा कालावधी जून २०१९ देण्यात आला होता. मात्र, कालावधी उलटून गेल्यानंतर संबंधित ठेकदार कंपनीला कालावधी वाढवून देण्यात आला आहे. सध्या बंधाºयाचे काम पूर्ण झाले असले तरी जॅकवेल, रस्ता, पॅनलरूम ही कामे अपूर्ण आहेत. ही कामे पावसाळ्यानंतर प्रगतिपथावर असल्याचे महाड औद्योगिक विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अजून दोन ते तीन महिने हे काम पूर्ण होण्यास लागणार असल्याने सध्या तरी जुन्याच जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जात असल्याने दूषित पाण्याची समस्या कायम राहिली आहे. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर दूषित पाण्याची समस्या दूर होण्याची शक्यता आहे.

नागरिकांचा त्रास होणार कमी
महाड औद्योगिक वसाहतीमधील टेमघर गावापासून वाहत येणारा नाला हा सावित्री नदीला येऊन मिळतो. या ठिकाणी सावित्री नदीत असलेल्या जॅकवेलमधून पाणी उचलले जाते आणि शेजारील औद्योगिक क्षेत्रात पुरवठा केला जातो. पाणी दूषित असल्याच्या तक्रारी अनेक वेळा नागरिकांनी केल्यानंतर या नवीन योजनेला मंजुरी मिळाली होती. यामुळे टेमघर नाल्याचे पाणी ज्या ठिकाणी नदीला मिळते, त्या ठिकाणी होणारे पाण्याचे प्रदूषण आणि त्यातून नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे. सध्या ज्या ठिकाणी जॅकवेल बांधण्यात येत आहे, तेथे बंधारा बांधल्याने दूषित पाणी जॅकवेलपर्यंत येणे शक्य होणार नाही. हे काम लांबलेला पाऊस यामुळे संथगतीने सुरू होते, असे एमआयडीसीच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.

हे काम लांबलेला पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे रखडले आहे. मात्र, उर्वरित काम लवकरच मार्गी लागून नागरिकांना या नव्या योजनेतून पाणीपुरवठा केला जाईल.
- एस. एस. गीते,
उप अभियंता, एमआयडीसी, महाड