शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

दिवेआगर समुद्रकिनाऱ्याची धूप, लाटांच्या तडाख्याने वनसंपदा नष्ट होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 2:08 AM

सततचे वादळ व सीमा ओलांडून समुद्राच्या किना-याला धडकत असलेल्या लाटांमुळे दिवेआगर समुद्रकिना-याची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे.

अभय पाटीलबोर्ली पंचतन : सततचे वादळ व सीमा ओलांडून समुद्राच्या किना-याला धडकत असलेल्या लाटांमुळे दिवेआगर समुद्रकिना-याची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. त्यामुळे किनाºयावरील सुरू, केतकी तसेच अन्य वनसंपदा हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने दिवेआगर समुद्राचे पाणी मानवी वस्तीमध्ये केव्हा धडकेल याचा आता नेम राहिलेला नाही. दिवेआगर समुद्रकिनारी मागील काही वर्षांपासून संरक्षक बंधारा बांधण्याच्या आतापर्यंत केवळ घोषणाच झाल्या. प्रत्यक्षात त्यासाठी आवश्यक निधी केव्हा येणार व संरक्षक बंधारा केव्हा होणार याच प्रतीक्षेत सागरप्रेमी व दिवेआगर ग्रामस्थ आहेत.दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. पश्चिमेला असणाºया अरबी समुद्रामुळे व गावाला नारळ, सुपारीच्या लाभलेल्या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण बागा यामुळे या किनाºयावर पर्यटक वीकेण्ड व सुट्टीची मौजमजा करण्यासाठी नेहमीच येत असतात. मात्र, समुद्रामध्ये होत असलेले भराव, सततची येणारी वादळे यामुळे भयंकर उसळणाºया लाटा यामुळे सुरूच्या झाडांची वनराई, केतकीच्या झाडांची वने, त्याचप्रमाणे इतरही औषधी व महत्त्वाची झाडे नष्ट होत आहेत. यासाठी समुद्रकिनारी अद्यापही कोणत्याही प्रकारे संरक्षक बंधारा नसल्याने ही धूप दिवसेंदिवस अधिक होत चालली आहे. दिवेआगरचा समुद्रकिनारा सुमारे तीन कि.मी. लांबीचा आहे, त्या ठिकाणी मोठा निधी खर्ची घालून उत्तम बंधारा बांधण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तत्कालीन खासदार व केंद्रीय मंत्री यांनी संरक्षक बंधाºयासाठी दोन कोटींच्या निधीची घोषणा केली; परंतु त्या घोषणेचे पुढे काय झाले याबाबत जनता अनभिज्ञ आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेत तटकरे यांनीही दिवेआगर येथील याच संरक्षक बंधाºयासाठी दोन कोटी रुपये मिळून देण्याची घोषणा केली आहे. दिवेआगर समर्थ पाखाडी बाजूचा भाग हा समुद्रकिनाºयाला लागून असल्याने समुद्राची अशीच धूप होत राहिल्यास समुद्राचे पाणी मानवी वस्तीमध्ये घुसण्यास वेळ लागणार नाही.त्याचप्रमाणे महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने किनाºयावर बांधलेले वॉच टॉवरही लाटांच्या माºयाने जमीनदोस्त झाला आहे. लोखंडी असलेला हा वॉच टॉवर आवश्यक असून, लोखंडी ऐवजी मजबूत काँक्रीटीकरणाचा बांधण्याची मागणी होत आहे.>पुणे येथील संस्थेच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा तर केंद्राच्या सागरी योजनेतून आणखी भरघोस निधी आणण्याचे प्रयत्न रायगडचे खासदार तसेच आमदार यांचे आहेत.- उदय बापट, सरपंच, दिवेआगर