शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यात कपात का?

By admin | Updated: October 1, 2014 23:41 IST

सुभाषअण्णांच्या काळापासून दौंड तालुक्यातील जनतेला वर्षातून पाण्याची पाच आवर्तने मिळायची. मी आमदार असेर्पयत त्यात कपात होऊ दिली नाही.

यवत : सुभाषअण्णांच्या काळापासून दौंड तालुक्यातील जनतेला वर्षातून पाण्याची पाच आवर्तने मिळायची. मी आमदार असेर्पयत त्यात कपात होऊ दिली नाही. मात्र, सध्याच्या आमदारांच्या काळात दौंडकरांना मिळणा:या हक्काच्या पाण्यात का कपात झाली? असा सवाल करीत विद्यमान आमदारांना दौंडकरांना याचे उत्तर द्यावे लागेल, असे माजी आमदार रंजनाताई कुल यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले.
हिंगणीगाडा, वासुंदे, जिरेगाव, रोटी, पांढरेवाडी, कुरकुंभ, कुसेगाव, पडवी परिसरात रंजनाताई कुल यांनी आज महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अॅड. राहुल कुल यांच्या प्रचारार्थ भेटी दिल्या. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली वाबळे, मनीषा नवले, नूतन खराडे, सरपंच ललिता खराडे, उपसरपंच संजय गायकवाड, ज्ञानदेव खराडे, बाळासाहेब कदम, जयसिंग ताकवले, संग्राम चांदगुडे, शरद लवांड, अप्पाजी खोमणो, विलास शिंदे, सुनील चव्हाण, मंजिरी खराडे, गुलशन शेख, ज्योती खराडे, सुवर्णा ताकवले, सुजाता खराडे, हेमा ताकवले, डॉ. सोनल खराडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 
या वेळी महिला मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. भेटीदरम्यान रंजनाताई यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि महिलांशी संवाद साधला.
खडकवासला धरणाचे पाणी दौंड तालुक्यातील शेतक:यांना वर्षातून पाचवेळा मिळवून देण्यासाठी तत्कालीन आमदार कै. सुभाषअण्णा कुल यांनी कसोशीने प्रय} केले आणि त्यांना यश मिळाले. मी आमदार असतानाही पाण्याची पाच आवर्तने कायम होती. आता मात्र, पाण्यावाचून शेतकरी तडफडत असताना आमदारांना ही अवस्था पाच वर्षांत दिसली नाही, हे दौंडकरांचे दुर्दैव आहे, असेही कुल म्हणाल्या. (वार्ताहर)
 
जानाई योजना, बंधारे आणि तलावाच्या माध्यमातून हिंगणीगाडा आणि परिसरात पाणी मिळाले होते. तसेच, तालुक्यात पहिल्यांदा बुडीत बंधारे बांधले; परंतु, सत्ताधा:यांनी या योजनांकडे दुर्लक्ष केल्याने विकास रखडला, त्यामुळे दौंडची जनता आता त्यांना माफ करणार नाही. आता आमची सत्ता आल्यानंतर परिसरात पुन्हा विकासाची गंगा आणू, असे आश्वासन माजी आमदार रंजनाताई कुल यांनी दिले.
पावणोतीन कोटींची कामे!
हिंगणीगाडा आणि परिसरात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पावणोतीन कोटी रुपयांची कामे केली आहेत, असे जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली वाबळे यांनी सांगितले. महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अॅड. राहुल कुल यांचा प्रचारदौरा आज खडकी, खोरवडी, कुसेगाव परिसरात झाला. या वेळी नागरिकांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केला. युवक, महिला, शेतकरी यांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध होतो आणि राहणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.