शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST

विजय मु-हे कुरुळी : तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीपर्यंत इंद्रायणी नदी भागातील चिखली, मोई, मोशी, कुरुळी,चिंबळी, केळगाव आदी भागात ...

विजय मु-हे

कुरुळी : तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीपर्यंत इंद्रायणी नदी भागातील चिखली, मोई, मोशी, कुरुळी,चिंबळी, केळगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे नदीचे प्रदूषण मोठया प्रमाणावर वाढले असून नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णीची वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीच्या आजूबाजूच्या परिसरात यामुळे दुर्गंधी पसरली आहे. जलचर प्राणी व नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नदीमध्ये सोडण्यात आलेल्या गटारांमुळे पाणी दूषित झाले आहे. रब्बी हंगामात नदीकाठच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कांदा. ऊस. ज्वारी. बटाटा. गहू. मका. पालेभाज्या आदी पिकांचे उत्पन्न घेतले आहे. या पिकांना नदीचे पाणी देताना त्यांच्या हातापायाला खाज येणे, डास चावल्याने विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी नदीपात्रात प्रशासक प्रशासनाकडून दरवर्षी प्रयत्न केले जातात. मात्र तोकड्या यंत्रणेमुळे इंद्रायणीच्या जलपर्णीची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. इंद्रायणी नदीत थेट ओढ्या-नाल्यातून दूषित आणि रसायनमिश्रित सांडपाणी थेट नदीत येत असल्याने जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण आणि जलपर्णी मुक्त करण्यासाठी शासनाने प्रभावी योजना राबवण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

इंद्रायणी नदीवरील पुलावरून ठिकठिकाणी नागरिक कचरा, प्लास्टिक, राडारोडा, नदीपात्रात बिनधास्तपणे टाकतात त्यांच्यावर देखील प्रशासनाने कारवाई करावी.

शांताराम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते

कुरुळी: (ता. खेड) परिसरात इंद्रायणी नदीवर पसरलेली जलपर्णी