विमानतळाविरोधात गावे एकवटली;शेतकरी आक्रमक, जमीन न देण्याची शपथ  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 05:02 AM2021-01-27T05:02:05+5:302021-01-27T07:10:58+5:30

नायगाव, पांडेश्वरमध्ये आज होणार बैठक, हात वर करुन विमानतळास एक इंचभरही जमीन न देण्याची शपथ घेण्यात आली. यामुळे एकत्र येत विमानतळाला विरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 

Villages rallied against the airport; farmers aggressive, vow not to give land | विमानतळाविरोधात गावे एकवटली;शेतकरी आक्रमक, जमीन न देण्याची शपथ  

विमानतळाविरोधात गावे एकवटली;शेतकरी आक्रमक, जमीन न देण्याची शपथ  

Next

भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असून त्याची जागा निश्चित झालेली नाही. विमानतळ बाधित क्षेत्रात पुरंदर उपसा जलसिंचन योजना व जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना असल्याने या ठिकाणचा शेतकरी ऊसशेती पिकवू लागला आहे. 

सोन्यासारख्या जमिनीवर विमानतळाचे भूत बसल्याने पुरंदरच्या पूर्व भागातील शेतकरी हैराण झाला आहे. याविरोधात येथील गावे एकत्र आले असून जमिनी न देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या प्रजासत्ताक दिनाला नायगाव, पांडेश्वर येथे ही बैठक होणार आहे. जमीन न देण्याचा एकमुखी ठराव ही गावे करणार आहेत. पुरंदर विमानतळाविरोधात येथील गावे एकवटली आहे. कितीही  किंमत मोजावी लागली, तरी विमानतळ होऊ देणार नाही, असा बैठकीत निर्णय करुन विमानतळ विरोधी घोषणा देण्यात आल्या. हात वर करुन विमानतळास एक इंचभरही जमीन न देण्याची शपथ घेण्यात आली. यामुळे एकत्र येत विमानतळाला विरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 

दिवसेंदिवस पुरंदर तालुक्यातील नियोजीत विमानतळ वादाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर, नायगाव, मावडी, पिंपरी या परिसरात विमानतळ होत असल्याचा बातम्या येऊ लागल्याने या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यासाठी पुरंदरच्या पूर्व भागातील गावोगावी बैठका घेण्यात येत आहेत. व विमानतळाला विरोध केला जात आहे.  कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे विमानतळ होऊन द्यायचे नाही. जमिनी द्यायच्या नाहीत या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. 
पुरंदर तालुक्यातील नियोजित सात गावांतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेत बदल करून पूर्व भागातील रिसे, पिसे, पांडेश्वर व आसपासच्या परिसरात विमानतळ हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याला विरोध दर्शविण्यासाठी नायगाव व पांडेश्वर येथे ग्रामस्थांनी बैठकीचे नियोजन केले आहे. यावेळी विमानतळ आमच्याकडे नकोच, असा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. आमच्या वडिलोपार्जित जमिनी जबरदस्तीने विमानतळासाठी बळकावून आम्हाला भकास करू नका. असा सूर येथील शेतकऱ्यांनी लावला आहे. 

सर्वपक्षीय कार्यकर्ते राहणार उपस्थित 
२६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता पूर्व भागातील विमानतळबाधित सर्व गावांची बैठक नायगाव येथील सिध्देश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच या बैठकीला सर्व गावातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आपापल्या वरिष्ठ नेत्यांना बोलवणे. व त्यांची विमानतळ विषयी भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचे ठरले आहे. जागा निश्चित न झाल्याने पुरंदर तालुक्यातील विनामतळाला पुन्हा विरोध होण्यास सुरूवात झाली आहे. तर खेड तालुक्यात विरोध मावळत आहे. बारामतीच्या विकासाठीच हे विमानळ पुरंदरला होत असल्याचा आरोप होत आहे. 

 

Web Title: Villages rallied against the airport; farmers aggressive, vow not to give land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.