शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

थेट सरपंच निवडीने ग्रामविकासाला मिळणार चालना

By admin | Updated: July 4, 2017 03:35 IST

सरपंचांची निवड थेट जनतेतून होण्याचा निर्णय चांगला असून त्यामुळे ग्रामविकासाला चालना मिळेल अशी भावना जिल्ह्यातील विविध स्तरातील

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सरपंचांची निवड थेट जनतेतून होण्याचा निर्णय चांगला असून त्यामुळे ग्रामविकासाला चालना मिळेल अशी भावना जिल्ह्यातील विविध स्तरातील राजकीय नेते, सरपंच-माजी सरपंच यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्षांप्रमाणेच सरपंचांचीही निवड आता थेट लोकांमधून होणार आहे. राज्य मंत्रीमंडळाने आज या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. जिल्ह्याच्या राजकारणात पंचायत समितीमध्ये महत्त्वाचे पद असल्याने त्याभोवती राजकारण फिरत असते. अशा सरपंचपदासंबंधात निर्णय झाल्याने त्याचे पडसाद जिल्ह्यामध्येही उमटले. काही ठिकाणी या निर्णयाचे स्वागत झाले तर काही ठिकाणी या निर्णयावर टीकाही होत आहे. ‘लोकमत’ने जिल्ह्यातील प्रमुख तालुक्याच्या ठिकाणी व गावागावांमध्ये संपर्क साधून मतमतांतराचा कानोसा घेतला.
शिरुर, खेड, बारामती, इंदापूर, जुन्नर, भोर, हवेली, दौंड आदी महत्त्वाच्या सर्व तालुक्यांमधून या महत्त्वाच्या निर्णयावर प्रतिक्रिया उमटल्या. बहुतेकांनी या निर्णयाचे स्वागतच केले आहे.
या निर्णयामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळणार असून, नागरिकांना त्यांच्या अपेक्षित कार्यकर्त्याला सरपंच म्हणून थेट विराजमान करता येईल, अशी प्रतिक्रिया काही सरपंचांनी व्यक्त केली. सरपंचपदासाठी होणारे लॉबिंगदेखील आता थांबेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निवडणुकीसाठी असलेली ७ वी पासची अट ही जास्त असायला हवी होती अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. सध्या सदस्य होण्यासाठी लाखो रुपये खर्च करून निवडून आल्यानंतर, सरपंच होण्यासाठी पुन्हा लॉबिंग करावे लागत आहे; पण आता सरपंच थेट जनतेतून निवडून येणार असल्याने स्वच्छ चारित्र्याचा व विकासाचे ध्येय असणारा सरपंच होणार असल्याने गावच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे. सरपंचाला आता विकासकामे करता येतील, असे मत डिंग्रजवाडीचे माजी सरपंच राहुल गव्हाणे यांनी व्यक्त केले.


सर्वसामान्य जनतेतून सरपंचपद निवडणे हा चांगला निर्णय आहे. निवडणुकीनंतर सदस्य पळवापळवी थांबून अर्थकारण संपून सामान्य जनतेतून सरपंच होईल. सर्वच निवडणुका या पद्धतीने झाल्यास सामान्य जनतेतून नेता तयार होईल.
- अशोक पवार, माजी आमदार (शिरूर, हवेली)

लोकमताने गावाने सरपंच निवडून दिलेल्या उमेदवाराने इतर सदस्यांच्या बहुमताने मताने गावच्या विकासकामांचे निर्णय घेणे बंधनकारक असावे. सरपंच पदाचा उमेदवार दहावी पास असल्यास गावचा विकास, नियोजन करता येईल.
- कांचन शिंदे,
मा. सरपंच, निघोजे

गावात एकी राहील
सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यापूर्वी फक्त गावात निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच निवडीचा अधिकार होता. गावात दुफळी निर्माण व्हायची आता तसे होणार काही. तसेच फोडाफोडीचे राजकारण आणि घोडेबाजार न होता प्रत्यक्ष सरपंच निवडीचा अधिकार ग्रामस्थांना मिळणार आहे.
- संतोष गार्डी
माजी सरपंच चिंचबाईवाडी, ता. खेड