शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
4
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
5
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
6
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
7
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
8
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
9
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
10
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
11
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
12
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
13
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
14
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
15
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
17
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
18
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
19
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
20
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकर–आहुपे खोऱ्यात पाण्याचा थेंबही आटला; आदिवासींवर दुष्काळाची भीषण झळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:05 IST

- पावसाळ्यात तुडुंब भरणारे जलस्रोत उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडे पडत असल्याने दीर्घकालीन जलव्यवस्थापनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.

तळेघर : “आख्खं आयुष्य गेलं पाणी टिपण्यात... आमच्या डोक्यावरचा हंडा कधी खाली उतरला नाही,” अशा केविलवाण्या शब्दांत भीमाशंकर परिसरातील तळेघर येथील आदिवासी महिलांनी आपली व्यथा मांडली. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोऱ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, जलस्रोत पूर्णतः आटल्याने नागरिकांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

या भागातील विहिरी, शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, तळी, डव्हरी आदी सर्व जलस्रोत कोरडे पडले आहेत. उरलेले पाणीही दूषित झाल्याने साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. परिणामी, महिलांना दररोज दोन ते तीन किलोमीटर अंतर पार करत कूपनलिका व टाक्यांमधून रात्रभर पाणी भरावे लागत आहे. अनेकदा तासनतास प्रतीक्षा करूनही फक्त एक हंडा पाणी मिळते.

पाण्याअभावी जनावरांचेही हाल सुरू असून, पिण्याच्या पाण्यासाठी ती सैरावैरा भटकताना दिसत आहेत. “डिंभे धरण जवळ असूनही आमच्या वाट्याला पाणी का येत नाही?” असा संतप्त सवाल आदिवासी बांधव उपस्थित करत आहेत. निवडणुकांच्या वेळी दिली जाणारी आश्वासने उन्हाळ्यात मात्र हवेत विरून जात असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.

तालुक्यातील १५ गावे व ९५ वाड्यांसाठी आठ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात पश्चिम आदिवासी भागात अपुरा व अनियमित पुरवठा होत असून, टँकर व्यवस्थेत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामपंचायतींनी टँकरची मागणी करूनही प्रशासन व ठेकेदारांच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांची वणवण सुरूच आहे.

विशेष म्हणजे, भीमाशंकर-आहुपे परिसर हा मुसळधार पावसासाठी ओळखला जातो. पावसाळ्यात चार महिने सतत पाऊस पडूनही उन्हाळ्यात तीव्र टंचाई भासणे ही गंभीर बाब ठरत आहे. पावसाळ्यात तुडुंब भरणारे जलस्रोत उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडे पडत असल्याने दीर्घकालीन जलव्यवस्थापनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.

माळीण, पोटेवाडी, झांजरेवाडी, कोकणेवाडी, लेंभेवाडी, पसारवाडी, तळेघर, आहुपे, नांदुरकीचीवाडी, जांभळवाडी, सावरली, गोहे बुद्रुक, बोरीचीवाडी, पाचवड, कोंढरे, दिगद, राजपूर, फुलवडे आदी गावांसह अनेक वाड्या-वस्त्यांतील नागरिक दुष्काळाच्या विळख्यात सापडले आहेत.

दरम्यान, “टँकरद्वारे पाणीपुरवठा योग्य प्रकारे होत आहे का, याची सखोल चौकशी करण्यात येईल,” अशी माहिती पंचायत समिती सभापती कैलास बुवा काळे यांनी दिली.  दुष्काळाच्या या झळांमुळे आदिवासी भागातील जीवनमान ढासळले असून, पाण्यासाठीची ही संघर्षमय लढाई अजून किती दिवस चालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Severe Drought Grips Bhimashankar-Ahupe Valley; Tribal Communities Face Water Scarcity

Web Summary : Bhimashankar-Ahupe faces severe water crisis. Depleted water sources force tribal women to trek kilometers for water. Tanker supply is irregular, and corruption allegations arise. Despite heavy rainfall, poor water management causes summer scarcity, impacting villages and livelihoods. An inquiry is promised.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेwater shortageपाणी कपातWaterपाणी