शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
4
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
5
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
6
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
7
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
8
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
9
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
10
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
11
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
12
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
13
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
14
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
15
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
16
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
17
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
18
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
19
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
20
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मावळात 'जलजीवन मिशन'मध्ये मुरतेय पाणी; जलवाहिनीचे काम अपूर्ण ठेवून निधी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 14:29 IST

- नळजोडण्यांचाही नाही पत्ता; महागावच्या ग्रामस्थांची जिल्हा परिषदेकडे तक्रार 

पवनानगर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनचा प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविण्याचा उद्देश असताना, मावळ तालुक्यातील काही गावांतील कामांमध्ये गंभीर अनियमितता समोर येत आहे. तालुक्यातील महागावच्या ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार दाखल करत, कामे अपूर्ण ठेवून निधी खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. याद्वारे प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार होते. मात्र प्रत्यक्षात अनेक वाड्धांमध्ये अद्यापही कामे अपूर्ण असून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

महागाव ग्रामपंचायत हद्दीतील मालेवाडी, धालेवाडी, निकमवाडी, दत्तवाडी, प्रभाचीवाडी आदी भागांमध्ये जलवाहिनीचे काम पूर्ण झालेले नाही. काही ठिकाणी वाहिन्या टाकण्यात आल्या असल्या तरी नळजोडणी नाही, तर काही भागात काम अर्धवट सोडून देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे एन उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

निवेदनात संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. काम पूर्ण न करताच निधी खर्च दाखविण्यात आला असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

पाण्यासाठी पायपीट कमी करण्याचा उद्देश

या योजनेअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जलशुद्धीकरण व्यवस्था, पाइपलाइन टाकणे व पाण्यासाठी होणारी पायपीट कमी करणे. 

कागदोपत्री कामे पूर्ण

अनेक गावांमध्ये कागदोपत्री कामे पूर्ण दाखवून प्रत्यक्षात नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामांची तपासणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अनेक गावमधील कामे अपूर्ण आहेत. त्या कामामध्येही अनियमितता आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 जलजीवन मिशनसारखी महत्त्वाची योजना गावासाठी मंजूर झाली; मात्र प्रत्यक्षात अनेक वाड्यांमध्ये आजही पाण्याची समस्या कायम आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे. काम अपूर्ण ठेवून निधी खर्च झाल्याचा संशय आहे. या प्रकरणातील दोर्षीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. ग्रामीण भागातील नागरिकांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.  - गणेश विलास साबळे, ग्रामस्थ  

English
हिंदी सारांश
Web Title : Maval's 'Jal Jeevan Mission' marred by incomplete work, misused funds.

Web Summary : Villagers in Maval allege incomplete Jal Jeevan Mission work and misused funds. Mahagaon residents filed a complaint, citing unfinished pipelines and a lack of water connections, leading to water scarcity. They demand an investigation into potential corruption.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे