शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोग दहशतवादाचा अवलंब करतोय ? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 10:07 IST

निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी म्हणून दहशतवादाचा अवलंब करतोय’, असा आरोप उद्धवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.

पुणे : ‘पश्चिम बंगालसारख्या राज्यात ममता बॅनर्जी यांच्यासारखे खंबीर नेतृत्व असताना त्यांच्या पराभवासाठी अडीच लाख पॅरा मिलिट्री फोर्स पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये नेऊन ठेवली आहे. साम, दाम, दंड, भेद याचा वापर होतोय. हा प्रशासकीय, निवडणूक आयोगाचा दहशतवाद असून, ही अत्यंत गंभीर गोष्ट देशाच्या लोकशाहीत घडतेय. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी म्हणून दहशतवादाचा अवलंब करतोय’, असा आरोप उद्धवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.

‘पुण्यात, पिंपरी-चिंचवडला काय झालं, याच पद्धतीने निवडणुका लढण्यात आल्या. कोणत्या परिस्थितीत महाराष्ट्रात निवडणुका झाल्या आणि होतायत हे मी तुम्हाला सांगायला नको. आम्ही लढणारे लोक आहोत’, असे संजय राऊत म्हणाले. ‘एन्काऊंटर स्पेशलिस्टवर निवडणुका जिंकण्याची गरज नरेंद्र मोदींसारख्या लोकप्रिय नेत्याला का भासावी?, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगाचे नेते आहेत. अंतराळात राजकारण सुरू झाले तर ते तिथले नेते होतील. जोडीला अमित शाह आहेतच. तरीही त्यांना पोलिस फोर्स नेऊन लोकांना धमक्या देऊन निवडणुका जिंकण्याची वेळ येत आहे. याचाच अर्थ त्यांना पराभव दिसतोय. पराभवाचे रूपांतर विजयात करण्यासाठी त्यांना असे उपद्व्याप करावे लागत आहेत’, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली.

विधान भवनाच्या पायरीवर तुम्हाला आमचा उमेदवार कळेल

आमचा एकच उमेदवार आहे, सगळ्यांचा मिळून. इतर लोकांनी याद्या जाहीर केल्या ठीक आहे. आमचा एक उमदेवार आहे. उद्या विधान भवनाच्या पायरीवर तुम्हाला आमचा उमेदवार कळेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जाऊन मविआचे नेतृत्व करावे, अशी सर्वांची भूमिका आहे. खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या प्रमुख नेत्यांनी त्यांना विनंती केलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.

एकाच धर्माकडून हे होत नाहीय

मीरा रोडमध्ये धर्म विचारून मारले जातेय, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यावर संजय राऊत म्हणाले की, ‘हे देशभरात सुरू आहे. एकाच धर्माकडून हे होत नाहीय. सर्व धर्मांकडून गढूळ वातावरण या देशात निर्माण केलं जात आहे. या देशातील शांतता, सुरक्षा, धर्मस्वातंत्र्य हे सगळं संकटात आणायला भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी जबाबदार आहे.’ 

ज्यांनी मलिदा खाल्ला ते त्यांच्या पक्षात किंवा भाजपमध्ये आहेत

गोरेगाव पत्रा चाळ प्रकरणात तुमच्यावर आरोप झाले, त्याच्या पुनर्विकासासाठी एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे. यावर राऊत म्हणाले की, ‘बोलवू द्या, नवीन काय आहे त्यात. माझ्यावर कसले आरोप झाले, कोर्टाला विचारा. ज्यांनी मलिदा खाल्ला ते त्यांच्या पक्षात किंवा भाजपमध्ये आहेत. कोर्टाने सांगितलंय, संजय राऊत यांना झालेली अटक बेकायदेशीर आहे. त्यांचा दुरान्वयेही संबंध नाही.’

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Raut Alleges Election Commission Resorts to Terrorism; Creates Stir

Web Summary : Sanjay Raut accuses the Election Commission of using terror tactics to favor the ruling party, citing West Bengal elections. He criticized the use of force and intimidation, linking it to potential election defeat. Raut announced their candidate reveal at Vidhan Bhavan.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रSanjay Rautसंजय राऊतMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा