शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला अतिवृष्टीचा फटका ; दर पुन्हा कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 18:47 IST

अतिवृष्टी आणि पुरामुळे कांद्याचे उत्पादन घटले असून कांद्याच्या किंमतीमध्ये माेठी वाढ झाली आहे.

पुणे : सांगली, कोल्हापूरचा पूर आणि नाशिक, पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका कांदा उत्पादनाला बसला आहे. यामुळे गुलटेकडी मार्केटयार्डातील तरकारी विभागात कांद्याची आवक कमी झाली आहे. याचा फटका दराला बसला असून, गेल्या दोन दिवसांत काद्याच्या दरात प्रतिकिलाे मागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली आहे. दर वाढल्याने शेतकरी वर्गात उत्सहाचे वातावरण आहे. परंतु शहरी ग्राहक दर वाढीच्या भितीने धास्तवला आहेत. रविवार (दि.१५) रोजी मार्केट यार्डात घाऊक बाजारात प्रती दहा किलोसाठी २८० ते ३२० रुपये दर मिळाला. तर हेच दर किरकोळ बाजारात प्रतिकिलो मागे ३० ते ३५ रुपये किलो पर्यंत गेला आहे.

गुलटेकडी मार्केटयार्डात रविवार (दि.१५) रोजी सुमारे  १०० ते १२५ ट्रक इतकी कांद्याची आवक झाली. राज्यातील बहुतांश भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी कांदा भिजलेला आहे. तसेच नवीन कांद्याची लागवड देखील धोक्यात आली असून, सद्यस्थितीत फक्त ३० जुन्या कांद्याचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेतकरी वर्ग बाजारपेठांमधील होणारी आवक व दरांमध्ये होणारी सातत्याने वाढ विचारात घेवूनच कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत आहेत. त्यामुळे मार्केटयार्डात कांद्याच्या दरात प्रतिकिलोसाठी दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे. सलग दोन सुट्ट्या असल्याने सुमारे १२५ ट्रक आवक झाली तरी देखील मागणी वाढल्यामुळे प्रतिदहा किलोस २८० ते ३२० रुपये भाव मिळाला. आठवड्यात सरासरी ५० ते ६० ट्रक इतकी दररोज आवक होत असून कांद्याचे दर दररोज वाढतच चालले आहेत.

राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातील साठवून ठेवलेला कांदा जवळपास संपत आला आहे. तसेच आंध्रप्रदेश व कर्नाटक  राज्यात देखील नवीन कांद्याची तुरळक आवक होत आहे. त्यामुळे या राज्यांमधून महाराष्ट्रातील जुन्या उच्च प्रतिच्या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

दोन महिन्यात दर आणखी वाढणारराज्यात प्रामुख्याने कांद्याचे पिक घेणा-या भागातच पूर, अतिवृष्टी झाली. याचा मोठा परिणाम कांदा पिकावर झाले आहे. याचा परिणाम सध्या मार्केटमध्ये मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे. तसेच पावसामुळे खराब दर्जाचा माल देखील अधिक प्रमाणात येतो. राज्यात प्रामुख्याने केरळ, कर्नाटक या भागातून देखील कांदा विक्रीसाठी येताे. परंतु या राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याने येथून येणारी आवक देखील घटली आहे. यामुळेच काद्यांच्या दराममध्ये वाढ झाली असून, येत्या दोन महिन्यांत हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.- रितेश पोमण, कांदा व्यापारी

टॅग्स :onionकांदाPuneपुणेRainपाऊस