शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी प्रवासीसंख्येत घट

By admin | Updated: October 11, 2015 04:39 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) प्रतिबस प्रवासीसंख्येत या वर्षीही तूट येत असल्याचे चित्र आहे.

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) प्रतिबस प्रवासीसंख्येत या वर्षीही तूट येत असल्याचे चित्र आहे. जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत ही सरासरी ७७० प्रवासी इतकी खाली पोहोचली आहे. सन २०१४ मध्ये प्रतिबस प्रवासीसंख्या ८५० तर २०१३ मध्ये ती ९०० इतकी होती. या वर्षी संचलनात अधिक बस असूनही पीएमपीकडून वाढविण्यात आलेल्या तिकीटदरामुळे पीएमपीचे उत्पन्न वाढले असले, तरी प्रतिबस प्रवाशांची संख्या ७० ते ८० ने घटली आहे.पीएमपीच्या ताफ्यात जवळपास दोन हजार बस आहेत. त्यात ६६३ बस या खासगी कंपन्यांच्या असून, त्या भाडेकराराने घेण्यात आलेल्या आहेत. मात्र, एवढ्या बस असूनही पीएमपीच्या दरदिवशी सरासरी १५०० बसच संचलनात असतात. बस वाढवून आणि मार्गांची फेररचना करूनही जानेवारी ते आॅगस्ट २०१५ या पहिल्या सहा महिन्यांत प्रतिबस प्रवासीसंख्या ७७० पर्यंत खाली आली आहे. जानेवारी २०१५ मध्ये हीच संख्या सरासरी ८९० होती. मात्र, आॅगस्टअखेर ती जवळपास १२० ने कमी झाली असल्याचे दिसून येते. यावरून पीएमपीच्या ढिसाळ कारभाराला वैतागून प्रवासी पीएमपीकडे पाठ करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.ठेकेदारांच्या बसमधील प्रवासीसंख्या घटली?पीएमपीकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या ठेकेदारांच्या बसचे प्रवासी प्रामुख्याने घटल्याचे चित्र आहे. या बसबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी असून, या सर्व बस पीएमपीकडून शहराबाहेर फिरविल्या जातात. या बस वेळेवर तसेच थांब्यावर थांबत नसल्याच्या मोठ्या तक्रारी पीएमपी प्रशासनाकडे आहेत. ठेकेदारांच्या बसला दररोज सरासरी २०० किमी संचलनाचे काम देण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना प्रतिकिलोमीटर दरही ठरवून देण्यात आलेला आहे. मात्र, एका बसमागे किती उत्पन्न असावे व किती प्रवासीसंख्या असावी, असे कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवासी असो अथवा नसो या वाहनांचे संचलन नियमित सुरूच आहे. तसेच त्यांना मिळणारा प्रतिकिमी निधीही वेळेवर दिला जात आहे.पीएमपीने या वर्षी १२ लाखांचा प्रवासी आकडा गाठला आहे. हा आकडा गाठण्यासाठी पीएमपीला मार्गावर १ हजाराहून अधिक बस उतराव्या लागल्या होत्या. २०१४ मध्ये मार्गावर १ हजार बस असूनही प्रतिबस प्रवासीसंख्या ही ८५० होती, तर २०१३ मध्ये मार्गावर ८०० बस असूनही ही संख्या ९०० होती. आता हा आकडा मार्गावर संचलनात असलेल्या बसचे प्रमाण पाहता वाढणे अपेक्षित होते. असे न होता रस्त्यावर १५०० बस असूनही हा आकडा प्रतिबस ७७० वर पोहोचला आहे. प्रशासनाकडून प्रवासीसंख्येपेक्षा उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जात असला तरी, उत्पन्न वाढण्यामागे पीएमपीकडून इतर खर्चात केलेली बचत तसेच तिकीटदर आणि पासच्या किमतीमध्ये वाढविण्यात आलेल्या रकमेमुळे भर पडली असल्याचे यावरून दिसून येते.पीएमपीकडून केवळ तिकीट वाढवून उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रवासीसंख्या घटताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्यक्षात प्रवासीसंख्या घट खासगी ठेकेदारांच्या बसमुळे आहे. त्याबाबतच्या शेकडो तक्रारी प्रवाशांनी केलेल्या आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बससेवा प्रवासीकेंद्रित होणे आवश्यक आहे. - जुगल राठी (अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच)