शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

दौंडकरांची पिण्याच्या पाण्याची ‘बोंब’!

By admin | Updated: May 25, 2014 05:00 IST

शहरातील नवगिरेवस्ती येथे बर्‍याच भागांमध्ये पाणीपुरवठा होत नाही. सिद्धार्थनगरला रात्री ८ वाजता, तर भीमनगरला रात्री १ वाजता पाणीपुरवठा होतो

दौंड : शहरातील नवगिरेवस्ती येथे बर्‍याच भागांमध्ये पाणीपुरवठा होत नाही. सिद्धार्थनगरला रात्री ८ वाजता, तर भीमनगरला रात्री १ वाजता पाणीपुरवठा होतो. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त असून, रात्री-अपरात्री महिलांसह कुटुंबीयांना जागरण करून पाणी भरावे लागत आहे. दौंड शहरात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. काही भागात कमी दाबाने, तर काही भागात पाणीपुरवठाच होत नाही. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नगरसेवक राजू बारवकर यांनी मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांच्याकडे केली आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी साठेल असा तलाव नगरपालिकेचा आहे. तरीदेखील गेल्या वर्षी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. ही समस्या दूर करण्यासाठी नगरपालिकेला लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला होता. गेल्या दोन वर्षांत शहरात जलवाहिन्या टाकणे, जलवाहिन्या दुरुस्त करणे, फिल्टर टँकचे नूतनीकरण करणे या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, तरीदेखील शहरातील काही भागात पाण्याची समस्या कायम आहे. नगर परिषदेचा कारभार एकाधिकारशाही पद्धतीने केला जात आहे. कुणालाही विश्वासात घेतले जात नाही, असे बारवकर यांनी निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)