शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

पावसावर आमचं जगणं अवलंबून; पोटासाठी शहरात करतो १५-२० हजारांत नोकरी, तरुण शेतकऱ्यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 15:37 IST

शहरात १५ ते २० हजारांत मिळेल ती नोकरी करून कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी तरुणाईची धडपड

राहुल गणगे

पुणे : रोजगारासाठी ग्रामीण भागातून मोठ्या शहरात, महानगरांत येणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गावाकडे दोन ते तीन एकर शेती आहे; परंतु, ती पावसाच्या भरवशावर पिकवावी लागते. त्यामुळे पोटापाण्यासाठी पुण्यात जेमतेम पगारावर नोकरीसाठी सुशिक्षित बेरोजगारांचा लोंढा मात्र वाढत आहे. शहरात १५ ते २० हजारांत मिळेल ती नोकरी करून या माध्यमातून कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी तरुणाई धडपडत आहे. पावसाळ्याचा तोंडावर शेती पिकवण्यासाठी चार पैसे जमा करून खते, बियाणे यांची जुळवाजुळव करून एखादे पीक घेण्यासाठी प्रयत्न केला जातो; परंतु, पावसाने साथ दिली तर एखाद्या पिकाचा फायदा होतो. नाहीतर पावसाने रूप दाखवले तर जगण्याचा वांदा होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण १५ ते २० हजाराच्या नोकरीसाठी आपले बस्तान शहराच्या ठिकाणी बसवताना दिसून येत आहे. तसेच जगण्याचे साधन नसल्याने पुणे किंवा इतर ठिकाणी नोकरीच्या शोधात स्थलांतर व्हावे लागत असल्याने यावेळी तरुणांनी आपली व्यथा ‘लोकमत’कडे मांडली.

उत्पन्न कमी त्यामुळे मिळेना हमी 

अल्पभूधारक शेतकरी शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो; परंतु, खाणारे अधिक आणि शेतीतील उत्पन्न कमी, त्यातच किडी रोगाचा प्रादुर्भाव मग सांगा शेती कशी करायची, अशी परिस्थिती सध्या अल्पभूधारक शेतकरीवर्गाची झाली आहे.

शेती, नोकरीचा मेळ बसेना आणि पोरगी मिळेना 

सध्या लग्न जमवायचे झाले तर शेतीसहीत नोकरी कराणारा पाहिजे. अशी डिमांड मुलींच्या कुटुंबीयांकडून होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जुळणे कठीण झाले आहे. शेती असूनही नोकरी नसल्याने कोणी मुलगी देण्यास तयार नाही. यामुळे शेतीचा खेळ अन् नोकरीचा मेळ काय बसेना आणि पोरगी कोणी देईना, अशी अवस्था झाली आहे.

गतिमान जीवनासाठी आकर्षण 

लोकसंख्येची घनता आणि जगण्याची स्पर्धा जास्त असल्याने शहरातील जीवन हे गतिमान आणि विकसित समजले जाणारे जीवन आहे. सांस्कृतिक, औद्योगिक आणि नैसर्गिक संपन्नता उपलब्धता तसेच शहरात उद्योगधंदे भरपूर प्रमाणात निर्माण झालेले आहेत. त्यामुळे रोजगार मिळवण्यासाठी लोक शहरांत स्थलांतर करत असतात.

म्हणून आम्ही करतो नोकरी

''लातूरपासून ८५ किलोमीटर अंतरावर असलेले जगळपूर बुद्रुक हे माझे गाव आहे. गावाकडे शेती आहे; परंतु, ती पावसाच्या भरवशावर पिकवावी लागते. ते पण पाऊस चांगला झाला तर पीक हाती येते नाही तर मातीत जाते. मग आमच्याकडे जगण्याचे साधन नसल्याने आम्हाला पुणे किंवा इतर ठिकाणी नोकरी करत कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. - कपिल कदम, जगळपूर बुद्रुक, सध्या धनकवडी, पुणे''

''मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी गावात माझी शेती आहे; परंतु, शेतीतून मिळणारे उत्पन्न तसेच होणारा खर्च यामुळे हाती काहीच मिळत नाही. त्यामुळे मी पुण्यात सध्या नोकरी करीत आहे; परंतु, शहरातही रोजगाराची मारामार होत आहे. कमी पगारात मिळेल ते काम करावे लागत आहे. - अविनाश वेदपाठक, मोहोळ, सध्या पुणे सदाशिव पेठ''

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीMONEYपैसाEmployeeकर्मचारीSocialसामाजिक