शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

Purandar Airport: नवा ‘पुणे पॅटर्न’, पुरंदर विमानतळासाठी ९० टक्के जमिनीच्या संपादनासाठी २ हजार शेतकऱ्यांची संमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 10:12 IST

संमती देण्याची मुदत संपली असून संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन सक्तीने संपादित करण्यात येईल. त्यांना बाजारभावाच्या ४ पट मोबदला देण्यात येईल.

पुणे: पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मोजणीपूर्वी शेतकऱ्यांची भूसंपादनास संमतीपत्रे घेण्यात आली आहेत. त्यानुसार २१ दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्यांनी तब्बल ९० टक्के जमिनीच्या संपादनासाठी संमती दिली आहे. यापूर्वी कोणत्याही प्रकल्पासाठी अशा पद्धतीने संमती घेऊन संपादन करण्यात आलेले नाही. त्यामुळे विकास प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी भूसंपादनाची संमती घेण्याचा पुणे पॅटर्न या निमित्ताने सुरू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. या प्रकल्पासाठी संमती देण्याची मुदत संपली असून आतापर्यंत ३ हजार एकरांपैकी २ हजार ७०० एकरांची २ हजार ८०० शेतकऱ्यांकडून संमती घेण्यात आली आहे.

विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र २ हजार ६७३ इतके होते. आता त्यात १ हजार ३८८ हेक्टरची कपात करून हे क्षेत्र १ हजार २८५ हेक्टर केले आहे. त्यानुसार जमिनीचे संपादन होणाऱ्या शेतकरी व जमीन मालकांकडून संमतीपत्र घेण्यासाठी २५ ऑगस्ट ते १८ सप्टेंबरपर्यंत कालावधी निश्चित केला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने विमानतळासाठी भूसंपादनास संमती देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सासवड आणि पुणे येथे स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता. त्यानुसार पहिल्या दिवशी अर्थात २६ ऑगस्ट रोजी ७६० शेतकऱ्यांनी १ हजार ७० एकर जमीन देण्यास तयार असल्याचे संमती पत्र दिले होते. तर अखेरच्या दिवशी सुमारे २ हजार ८०० शेतकऱ्यांनी २ हजार ७०० एकर जमिनीच्या संपादनाची संमती दिली आहे. त्यामुळे एकूण ३ हजार क्षेत्रापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्राच्या संपादनाची संमती मिळाली आहे.

याबाबत डुडी म्हणाले, “राज्यात कोणताही विकास प्रकल्प सुरू करताना शेतकऱ्यांकडून किंवा जागा मालकांकडून संमतीपत्रे घेण्यात येत नाहीत. पुरंदर विमानतळाच्या प्रकल्पाबाबत मात्र, संमतीपत्रे घेण्याचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात येत आहे. हा राज्यातील पहिला प्रयोग आहे. मोजणीपूर्वीच सुमारे ९० टक्के जमिनीच्या संपादनाची संमती मिळाली आहे. त्यामुळे यापुढील विकास प्रकल्पांसाठी हा पुणे पॅटर्न आदर्श ठरणार आहे.”

संमती देण्याची मुदत संपली असून संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन सक्तीने संपादित करण्यात येईल. त्यांना बाजारभावाच्या ४ पट मोबदला देण्यात येईल. विकसित भूखंडाचा परतावा देण्यात येणार नाही. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरairplaneविमानAirportविमानतळcollectorजिल्हाधिकारीMONEYपैसाFarmerशेतकरीSocialसामाजिक