शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Purandar Airport: नवा ‘पुणे पॅटर्न’, पुरंदर विमानतळासाठी ९० टक्के जमिनीच्या संपादनासाठी २ हजार शेतकऱ्यांची संमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 10:12 IST

संमती देण्याची मुदत संपली असून संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन सक्तीने संपादित करण्यात येईल. त्यांना बाजारभावाच्या ४ पट मोबदला देण्यात येईल.

पुणे: पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मोजणीपूर्वी शेतकऱ्यांची भूसंपादनास संमतीपत्रे घेण्यात आली आहेत. त्यानुसार २१ दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्यांनी तब्बल ९० टक्के जमिनीच्या संपादनासाठी संमती दिली आहे. यापूर्वी कोणत्याही प्रकल्पासाठी अशा पद्धतीने संमती घेऊन संपादन करण्यात आलेले नाही. त्यामुळे विकास प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी भूसंपादनाची संमती घेण्याचा पुणे पॅटर्न या निमित्ताने सुरू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. या प्रकल्पासाठी संमती देण्याची मुदत संपली असून आतापर्यंत ३ हजार एकरांपैकी २ हजार ७०० एकरांची २ हजार ८०० शेतकऱ्यांकडून संमती घेण्यात आली आहे.

विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र २ हजार ६७३ इतके होते. आता त्यात १ हजार ३८८ हेक्टरची कपात करून हे क्षेत्र १ हजार २८५ हेक्टर केले आहे. त्यानुसार जमिनीचे संपादन होणाऱ्या शेतकरी व जमीन मालकांकडून संमतीपत्र घेण्यासाठी २५ ऑगस्ट ते १८ सप्टेंबरपर्यंत कालावधी निश्चित केला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने विमानतळासाठी भूसंपादनास संमती देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सासवड आणि पुणे येथे स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता. त्यानुसार पहिल्या दिवशी अर्थात २६ ऑगस्ट रोजी ७६० शेतकऱ्यांनी १ हजार ७० एकर जमीन देण्यास तयार असल्याचे संमती पत्र दिले होते. तर अखेरच्या दिवशी सुमारे २ हजार ८०० शेतकऱ्यांनी २ हजार ७०० एकर जमिनीच्या संपादनाची संमती दिली आहे. त्यामुळे एकूण ३ हजार क्षेत्रापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्राच्या संपादनाची संमती मिळाली आहे.

याबाबत डुडी म्हणाले, “राज्यात कोणताही विकास प्रकल्प सुरू करताना शेतकऱ्यांकडून किंवा जागा मालकांकडून संमतीपत्रे घेण्यात येत नाहीत. पुरंदर विमानतळाच्या प्रकल्पाबाबत मात्र, संमतीपत्रे घेण्याचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात येत आहे. हा राज्यातील पहिला प्रयोग आहे. मोजणीपूर्वीच सुमारे ९० टक्के जमिनीच्या संपादनाची संमती मिळाली आहे. त्यामुळे यापुढील विकास प्रकल्पांसाठी हा पुणे पॅटर्न आदर्श ठरणार आहे.”

संमती देण्याची मुदत संपली असून संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन सक्तीने संपादित करण्यात येईल. त्यांना बाजारभावाच्या ४ पट मोबदला देण्यात येईल. विकसित भूखंडाचा परतावा देण्यात येणार नाही. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरairplaneविमानAirportविमानतळcollectorजिल्हाधिकारीMONEYपैसाFarmerशेतकरीSocialसामाजिक