शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

ना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा; ना त्यांच्याएवढे वेतन व रजा, ना सवलती, अंगणवाडी सेविकांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:28 IST

सरकारच्या बहुचर्चित लाडकी बहीण योजनेचे प्रति फॉर्म ५० रुपये मानधन देण्याचे जाहीर झाले. मात्र, हे मानधन अनेक जिल्ह्यांत अद्याप मिळालेलेच नाही

पुणे: अंगणवाडी योजना ५० वर्षांची झाली. मात्र, या योजनेत काम करणाऱ्या २ लाख महिलांची केंद्र व राज्य सरकारकडून कायमच उपेक्षा सुरू आहे. स्तनदा माता, तिचे अपत्य यांचा सांभाळ करायचा आणि सरकारी योजनांचा प्रचार व प्रसारही सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. असे असूनही त्यांना ना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा, ना त्यांच्याएवढे वेतन व रजा, ना कसल्या सवलती अशी या २ लाख महिला कर्मचाऱ्यांची स्थिती आहे.

केंद्र सरकारच्या एकात्मिक बाल विकास या योजनेंतर्गत राज्य सरकार ही अंगणवाडी योजना १९७५ पासून चालवते. सुरुवातीला केंद्र सरकारचे ८० टक्के व राज्य सरकारचे २० टक्के याप्रमाणे योजनेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना वेतन दिले जायचे. एक मुख्य अंगणवाडी ताई व एक मदतनीस अशा सध्या या योजनेत तब्बल २ लाख महिला काम करीत आहेत. त्यांना सध्या दरमहा १३ हजार ५०० रुपये मुख्य ताईला व ८ हजार ५०० रुपये मदतनीस महिलेला वेतन दिले जाते. केंद्र सरकारने मागील काही वर्षांपासून अनुदानाची रक्कम कमी केली आहे. आता केंद्र सरकार ५० टक्के व राज्य सरकार ५० टक्के याप्रमाणे अतिशय अनियमित स्वरूपात वेतन मिळते. वेतन वाढवताच पूर्वीची सकाळी १० ते दुपारी ३ ही वेळ बदलून आता सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली.

राज्यात १० ते १२ संघटना अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम करतात. राज्य अंगणवाडी कर्मचारी सभा व अन्य एकदोन त्यातील प्रमुख संघटना आहेत. सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची मिळून एक संयुक्त कृती समिती आहे. या समितीच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सरकारबरोबर संघर्ष केला जातो. मात्र, तात्पुरती आश्वासने किंवा दिवाळी भाऊबीज वगैरे जाहीर करून सरकार कायमच या महिलांच्या तोंडाला पाने पुसत आहेत, असे संघटनांचे म्हणणे आहे. मोर्चे, आंदोलने, निवेदने, प्रत्यक्ष भेट, चर्चा व काम बंद सारखे आंदोलन केल्यानंतरही सरकार मागील अनेक वर्षे या महिला कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची संघटनांची तक्रार आहे. कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी आता १५ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा व निदर्शने करण्यात येणार आहेत.

सरकारच्या बहुचर्चित अशा लाडकी बहीण योजनेचे अर्ज ग्रामीण भागात याच महिला कर्मचाऱ्यांकडून भरून घेण्यात आले. त्यासाठी त्यांना प्रति फॉर्म ५० रुपये मानधन देण्याचे जाहीर झाले. मात्र, हे मानधन अनेक जिल्ह्यांत अद्याप मिळालेलेच नाही, अशी माहिती काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

योजनेला ५० वर्षे झाली; पण अजूनही त्यात काम करणाऱ्या महिलांना न्याय मागण्यांसाठी झगडावे लागते आहे, हे राज्याचे दुर्दैव आहे. ग्रामीण भागातील महिला व बालकांचे आरोग्य संवर्धनाचे महत्त्वाचे काम करणाऱ्या महिलाच दुर्लक्षित राहतात, हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला लाजिरवाणे आहे. सरकारने या महिलांचा प्राधान्याने विचार करावा. -नितीन पवार, अंगणवाडी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती

 

English
हिंदी सारांश
Web Title : Anganwadi Workers' Plight: No Status, Salary, or Benefits

Web Summary : Anganwadi workers, crucial for rural childcare and government schemes, face neglect despite 50 years of service. They lack proper status, salaries, and benefits. Unions plan protests over unmet demands, including pending payments for government scheme work.
टॅग्स :PuneपुणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारWomenमहिलाSocialसामाजिकMONEYपैसाEmployeeकर्मचारीEducationशिक्षण