शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सर्वाधिक सायबर हल्ले महाराष्ट्रात, पाच शहरांना जास्त धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 3:42 AM

पाच शहरांना जास्त धोका : ‘क्विक हील टेक्नॉलॉजीस’ संस्थेचे संशोधन

पुणे : ‘डिजिटल इंडिया’ म्हणून देशाची ओळख असली, तरी सायबर हल्ल्यांनी अनेकांची झोप उडवली आहे. पुण्यात रोज दहा ते पंधरा सायबर हल्ले होत असून, त्यास ज्येष्ठ नागरिक बळी पडत आहेत. देशात सर्वाधिक सायबर हल्ले महाराष्ट्रात होत आहेत. ग्राहक, व्यवसाय आणि सरकार यांना ‘आयटी’ सुरक्षा व ‘डेटा प्रोटेक्शन’ सुविधा देणाऱ्या ‘क्विक हील टेक्नॉलॉजीस’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

महाराष्ट्र व दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना २०१९ मध्ये सर्वात जास्त लक्ष्य करण्यात आले. महाराष्ट्रात ३ कोटी ८० लाख, तर दिल्ली एनसीआरमध्ये २ कोटी ५० लाख ‘सायबर थ्रेट’ उघड झाले. पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात यांनाही सायबर हल्ल्यांचा धोका वाढत आहे. नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता व पुणे या शहरांवर सायबर गुन्हेगार लक्ष ठेवून आहेत. देशात रोज २० लाखांहून अधिक ‘सायबर थ्रेट’ उघड झाले.या अहवालाविषयी संशोधन संस्थेचे संचालक संजय काटकर म्हणाले, खासगी माहिती विकून पैसे कमावण्यासाठी असुरक्षित डिजिटल डिव्हायसेस हॅक केले जातात. त्याकरिता सायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रांचा वापर करत आहेत. समाजासाठी धोकादायक कारस्थाने केली जातात, अशा ठिकाणी ही माहिती विकली जाते. जागरूकतेचा अभाव, असुरक्षितता व जुन्या आॅपरेटिंग सिस्टिम्स यांमुळे ग्राहक त्यांना सहजपणे बळी पडतात.वायफाय राऊटर्सवरही हल्लेडिजिटल धोक्यांपासून वाचण्यासाठी वायफाय राऊटर्स सारखी साधने सुरक्षित असूनही सायबर गुन्हेगारांनी नव्या पद्धतींद्वारे त्यांच्यावरही हल्ले केले. स्मार्ट टीव्ही, फोन, आयपी कॅमेरे यासारख्या स्मार्ट आयओटीवर आधारित डिव्हाइसमधील असुरक्षिततेचाही त्यांनी वापर केला आहे.स्मार्टफोन असुरक्षितसायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने ते ओळखणे वा पकडले जाणे अवघड होत आहे. स्मार्टफोन सर्वाधिक असुरक्षित व सायबर गुन्ह्यांना पटकन बळी पडू शकतील अशा डिजिटल डिव्हायसेसपैकी एक आहेत. स्पायवेअर व मालवेअर वापरण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅप्सवर हल्ला करून संवेदनशील माहिती चोरण्याचे प्रयत्न हॅकर्सनी २०१९ मध्ये केले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसdigitalडिजिटल