शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
2
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
3
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
4
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
5
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
6
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
7
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
8
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
9
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
10
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
11
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
12
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
13
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
14
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
15
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
16
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
17
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
18
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
19
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
20
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

Maharashtra Election 2019 : भाजपा-शिवसेनेची थाळी खाऊन आमची थाळी ठरवू - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 11:20 AM

'माझ्या कॅबिनेटमंत्री पदासाठी मोदींशी बोलण्याची विनंती केली आहे'

पुणे : भाजपाने 5 रुपयांना थाळी जाहीर केली आहे, तर शिवसेनेने 10 रुपयांना थाळी देणार असल्याचे म्हटले आहे. या दोघांच्या थाळ्या खाल्ल्यानंतर आमची थाळी ठरवू, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. पुण्यात आरपीआयचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, "आम्ही 8 रुपयांना थाळी जाहीर करणार होतो, परंतु भाजपाने 5 रुपयांना आणि शिवसेनेने 10 रुपयांना थाळी जाहीर केली. त्यामुळे या दोघांची थाळी खाऊन आम्ही आमची थाळी जाहीर करू. विधानसभेला आम्हाला आठ जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. त्या मिळाल्या नाहीत. आम्ही त्या बदल्यात माझ्या कॅबिनेटमंत्री पदासाठी मोदींशी बोलण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर राज्यात कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची देखील मागणी केली आहे. तसेच, 4 महामंडळाची मागणी देखील केली आहे".

याशिवाय, वंचितबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले, 'वंचितचा किंचित परिणाम होणार नाही. वंचित आघाडी काढून वंचितांना वंचित ठेवण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा प्रयत्न आहे. त्यांना सत्ता हवी असेल तर त्यांनी भाजपासोबत आमच्या सोबत यावे." 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019