शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आम्हालाबी महाविद्यालयामध्ये जाऊ द्या की हो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:11 IST

पुणे: राज्यातील पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय झाला असून, नवीवी ते बारावीचे वर्गही सुमारे दोन महिन्यांपासून ...

पुणे: राज्यातील पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय झाला असून, नवीवी ते बारावीचे वर्गही सुमारे दोन महिन्यांपासून सुरू आहेत. मात्र, महाविद्यालायीन विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिक्षण घेण्यापासून रोखले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून आम्हालाही कॉलेजमध्ये जाऊ द्या, अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने कोरोनाबाबत आवश्यक खबरदारी घेवून शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. नववी ते बारावीनंतर आता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी सुध्दा आता शाळेत जाणार आहेत. त्यामुळे आम्ही कॉलेजमध्ये केव्हा जाणार ? असा सवाल महाविद्याललयीन विद्यार्थी विचारत आहेत.तसेच उच्च शिक्षण विभागाने सर्व महाविद्यालय सुरू करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे शिक्षणतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

दररोज महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेण्याचा अनुभव ॲानलाइन शिक्षणात घेता येत नाही. तसेच मित्र-मैत्रिण भेटत नाहीत. त्यामुळे आता अनेक विद्यार्थी घरी बसून कंटाळलेले आहेत. त्यांना महाविद्यालयात जाण्याची आस लागली आहे.

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांबाबत उच्च शिक्षण विभागाने दाखवलेली तत्परता महाविद्यालय सुरू करण्याबाबतही दाखवावी. शासन आणखी किती दिवस महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णयाचे घोंगडे भिजत ठेवणार ? अशी चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण अडसूळ म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांची आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परिपक्वता विचारात घेता आता महाविद्यालये सुरू झाली पाहिजेत.विद्यार्थ्यांचे अधिक शैक्षणिक नुकसान होऊ नये,यासाठी तात्काळ महाविद्यालये सुरू व्हावीत.

-------------

पाचवी ते बारावीचे विद्यार्थी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात जातात आणि महाविद्यालयीन विद्यार्थी जात नाहीत. हे संयुक्तिक नाही.घरी बसून विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आता शासनाने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. -प्रा. नंदकुमार निकम , ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

------------------------------------------------

विद्यार्थ्यांसह शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकाला महाविद्यालये सुरू व्हावीत,असे वाटत आहे.कोरोनानंतर महाविद्यालये वगळता सर्व काही सुरू झाले आहे.त्यामुळे महाविद्यालये सुध्दा सुरू झाली पाहिजेत,असे राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या मनात केव्हा येणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ