शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
4
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
5
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
6
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
7
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
8
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
9
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
10
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
13
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
14
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
15
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
16
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
17
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
18
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
19
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
20
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीमध्ये सातत्य ठेवा

By admin | Updated: July 2, 2017 01:53 IST

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ही चांगली बाब आहे. मात्र अशा

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ही चांगली बाब आहे. मात्र अशा प्रकारचे कार्यक्रम दर तीन महिन्यांतून राबवून यामध्ये सातत्य ठेवा, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केली.
जिल्हा परिषद, कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक विभागाच्या वतीने स्व़ वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देवकाते बोलत होते़ या वेळी जिल्ह्यातील उत्कृष्ठ शेतकरी आणि शेतकरी गटांचा स्मृतीचिन्ह, व सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला़ तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माहिती पुस्तीकेचे प्रकाशनही करण्यात आले़
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, कृषी अधिक्षक सुभाष काटकर, विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे आदी उपस्थित होते़
देवकाते म्हणाले की, जिल्ह्यात जिल्हा परिषद व विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ओढा खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातून पाणी अडवा व पाणी जिरवा ही संकल्पना साध्य होणार आहे त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने सिमेंटचे बंधारे बांधावेत़
यंदा अर्थसंकल्पामध्ये सेंद्रीस शेतीसाठी अनुदान दीडपट करण्यात आले आहे. दरम्यान कृषी विभागास कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नसल्याचेही देवकाते यांनी नमूद केले़ या वेळी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सुजाता पवार आदींची भाषणे झाली़ सुभाष काटकर यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी आभार केले़

..तर तुमचे कार्यक्रम तुम्हीच करा

कृषी दिनानिमित्त कृषी सभापती सुजाता पवार यांच्या शिरुर तालुक्यात कार्यक्रम आयोजित करावा, असे त्यांना वाटत होते तसेच बारामती तालुक्यातीलही काही ग्रामस्थांना कार्यक्रम तिकडे आयोजित करावा असे वाटत होते. मात्र कृषी विभागातील अधिकारी हा कार्यक्रम पुण्यातच घ्यावा, यावर ठाम होते़
मात्र जिल्हा परिषदेला कुठे कार्यक्रम घ्यायचा हे ठरविण्याचाही अधिकार नसेल तर तुमचे कार्यक्रम तुम्हीच करा अशा शब्दात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी नाराजी व्यक्त केली़ तसेच तुम्ही टाळाटाळ कराल तर पालकमंत्री आणि कृषीमंत्र्यांशी पत्रव्यवहार करु असेही देवकाते यांनी सुनावले़