महिलांसाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायची देवेंद्र फडणवीस यांची तयारी आहे का? सुषमा अंधारे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 20:05 IST2026-04-21T20:03:23+5:302026-04-21T20:05:37+5:30
केंद्रामध्ये महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी विरोध केल्यानंतर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली.

महिलांसाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायची देवेंद्र फडणवीस यांची तयारी आहे का? सुषमा अंधारे यांचा सवाल
पुणे : महिला आरक्षणाची भ्रूणहत्या १९५१ मध्ये झाली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे विधेयक मांडले होते. त्याला विरोध झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी राजीनामा दिला होता. महिलांसाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायची देवेंद्र फडणवीस यांची तयारी आहे का, असा सवाल उद्धवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला. भाजप खरोखर पुरोगामी विचारसरणीचा असेल तर त्यांनी २०२९च्या लोकसभेत सत्तेवर आल्यास महिला पंतप्रधान आणि महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्रिपद द्यावे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक सरसंघचालकपदीही महिला नियुक्त करावी. याला आमचाही पाठिंबा असेल, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रामध्ये महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी विरोध केल्यानंतर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज सुषमा अंधारे यांनी या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या विविध मुद्द्यांचा समाचार घेतला.
मुख्यमंत्र्यांनी ‘विरोधकांनी विधेयकाची भ्रूणहत्या केली’ असा उल्लेख केला होता. त्यावर अंधारे यांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांचा उल्लेख करून विरोधकांवर टीका केली. त्यावर ‘महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेल्या गुलामगिरी’ आणि शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकांचे जाहीर वाचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक कार्यक्रमात करणार का? असे आव्हान सुषमा अंधारे यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिले. २० आणि २२ स्पटेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महिला आरक्षण विधेयक संमत झाल्याचे केलेले ट्विट अंधारे यावेळी दाखविले.
महिलांना आरक्षण द्यायचेच असेल तर ५४३ मधून द्या, असे सांगतानाच जनगणनेनंतर लोकसभेनंतर लोकसंख्येनुसार खासदारांची संख्या वाढणार असल्याचे सांगितले जात असले तरी दक्षिणेतल्या खासदारांची संख्या आहे तेवढीच राहणार आहे. उत्तरेतील मात्र खासदारांची संख्या वाढणार असून, दक्षिण आणि उत्तरेतील हा वाद निर्माण करण्याची भारतीय जनता पक्षाला गरजच काय होती, असाही सवाल खरात यांनी उपस्थित केला. भोंदू अशोक खरात याची मालमत्ता १५ हजार कोटी असल्याचे बोलले जात असून, याची सखोल चौकशी करावी तसेच खरात याची सुरक्षितता वाढावी, कारण अनेक मोठी नावे यातून बाहेर येऊ शकतात,’ अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.